आता पोस्टातसुद्धा जमा करू शकता दोन हजारांची नोट

मुंबई (प्रतिनिधी) : दोन हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये बदलून मिळत आहेत. त्यासाठी आरबीआयने ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतची मुदत दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे आता तुम्हाला या नोटा पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा जमा करता येणार आहे.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर लोकांमध्ये आज काही प्रमाणावर संभ्रमाचे वातावरण आहे. तुम्ही एकतर २ हजार रुपयांची नोट बदलू शकता किंवा तुम्ही पुढील ४ महिन्यांसाठी तुमच्या बँक खात्यात जमा करू शकता. दोन हजारांच्या नोटा बँका आणि रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयात जमा केल्या जात आहेत. यापुढे तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्येही या नोटा जमा करता येणार आहेत. तुम्ही या नोटा फक्त जमा करू शकता. त्या तुम्हाला बदलून मिळणार नाहीत, असे पोस्ट ऑफिसकडून सांगण्यात येत आहे.


रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, दोन हजार रुपयांची नोट फक्त बँका आणि आरबीआयच्या १९ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये बदलता येणार आहे. यामध्ये पोस्ट ऑफिसचा उल्लेख नाही. त्याचे कारण पोस्ट ऑफिसमध्ये नोट बदलण्याची सेवा उपलब्ध नाही. तुम्ही तुमच्या पोस्ट ऑफिस खात्यात दोन हजार रुपयांची नोट जमा करू शकता. कारण दोन हजारांची नोट कायदेशीर निविदा राहते. म्हणूनच ते घेण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही. मात्र यासाठी ज्या पोस्ट ऑफिस खातेदाराने नोट जमा केली आहे. त्याच्या खात्याची केवायसी असणे आवश्यक आहे. २३ मे २०२३ पासून २ हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याची प्रक्रिया सुरु झाली.

Comments
Add Comment

आता मेट्रो तिकीट Uber वर; प्रवाश्यांना तिकीटासह मिळणार नवीन सवलती

मुंबई : मुंबई मेट्रोने प्रवाशांसाठी डिजिटल सुविधांमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता मेट्रोचे तिकीट थेट Uber

सुषमा अंधारे यांच्या 'त्या' आरोपांवर रुपाली चाकणकर यांचं स्पष्टीकरण; "मी असं काहीही..."

मुंबई : नाशिकमधील अंकशास्त्रज्ञ अशोक खरात प्रकरणामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याचाच परिणाम

महाराष्ट्रात हवामानाचा उलटसुलट खेळ; काही ठिकाणी उष्णतेचा तडाखा, तर ७ जिल्ह्यांत गारपिटीचा धोका

मुंबई : राज्यात सध्या हवामानात सतत बदल होत असून हवामानाचा खेळ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची तीव्रता

रेमंडचे एमडी गौतम सिंघानिया यांचा अपघात स्पीडबोट उलटली अन्.... दोघे जण बेपत्ता

मुंबई : उद्योग क्षेत्रातील प्रमुख नाव असलेले रेमंड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया हे मालदीवमध्ये

प्रलंबित मागण्यांसाठी 'बेस्ट'मधील विविध संघटनांचे अतिरिक्त आयुक्तांकडे गाऱ्हाणे

मुंबई : बेस्ट उपक्रमातील प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन व मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे बेस्ट

...तर गारगाई धरणाचा प्रस्ताव रद्द होणार?

नव्याने निविदा मागवून कंपनीची निवड केली जाण्याची शक्यता मुंबई :  गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या