आता पोस्टातसुद्धा जमा करू शकता दोन हजारांची नोट

मुंबई (प्रतिनिधी) : दोन हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये बदलून मिळत आहेत. त्यासाठी आरबीआयने ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतची मुदत दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे आता तुम्हाला या नोटा पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा जमा करता येणार आहे.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर लोकांमध्ये आज काही प्रमाणावर संभ्रमाचे वातावरण आहे. तुम्ही एकतर २ हजार रुपयांची नोट बदलू शकता किंवा तुम्ही पुढील ४ महिन्यांसाठी तुमच्या बँक खात्यात जमा करू शकता. दोन हजारांच्या नोटा बँका आणि रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयात जमा केल्या जात आहेत. यापुढे तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्येही या नोटा जमा करता येणार आहेत. तुम्ही या नोटा फक्त जमा करू शकता. त्या तुम्हाला बदलून मिळणार नाहीत, असे पोस्ट ऑफिसकडून सांगण्यात येत आहे.


रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, दोन हजार रुपयांची नोट फक्त बँका आणि आरबीआयच्या १९ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये बदलता येणार आहे. यामध्ये पोस्ट ऑफिसचा उल्लेख नाही. त्याचे कारण पोस्ट ऑफिसमध्ये नोट बदलण्याची सेवा उपलब्ध नाही. तुम्ही तुमच्या पोस्ट ऑफिस खात्यात दोन हजार रुपयांची नोट जमा करू शकता. कारण दोन हजारांची नोट कायदेशीर निविदा राहते. म्हणूनच ते घेण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही. मात्र यासाठी ज्या पोस्ट ऑफिस खातेदाराने नोट जमा केली आहे. त्याच्या खात्याची केवायसी असणे आवश्यक आहे. २३ मे २०२३ पासून २ हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याची प्रक्रिया सुरु झाली.

Comments
Add Comment

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री

चैत्यभूमीवर गर्दी टाळण्यासाठी दादरमधील वाहतुकीत बदल

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर गर्दी लक्षात घेता वाहतूक

प्रभादेवीतील साई सुंदरनगर, कामगारनगरमधील नाल्यांचे बांधकाम होणार

नाल्याच्या रुंदीकरण कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती मुंबई : मुंबईतील प्रभादेवी येथील साई सुंदरनगर,