अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा अपघातात मृत्यू

मुंबई: 'साराभाई वर्सेस साराभाई' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये जॅस्मिनच्या भूमिकेने सर्वांना हसवणारी अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा कार अपघातात मृत्यू झाला. शोचे निर्माते आणि दिग्दर्शक जे. डी. मजेठिया यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत हिमाचल प्रदेशमध्ये हा अपघात झाल्याचे सांगितले. तिच्या अपघाती मृत्यूच्या बातमीने मालिकाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.


याबाबतचे सविस्तर वृत्त असे, वैभवी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत कारने येत होती. अचानक वळणावर कारचे नियंत्रण सुटले आणि कार खड्ड्यात पडली, त्यात वैभवीचा मृत्यू झाला. तिच्या पतीची प्रकृती स्थिर आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती पण शोच्या निर्मात्यांनी बुधवारी याची माहिती दिली.



निर्माते जे. डी. मजेठिया यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, "आयुष्य खूप क्षणभंगूर आहे. साराभाई vs साराभाई मधील 'जॅस्मिन' म्हणून ओळखली जाणारी एक अतिशय चांगली अभिनेत्री, खास मैत्रीण वैभवी उपाध्यायचे निधन झाले. कुटुंबीय तिला उद्या सकाळी ११ वाजता मुंबईत अंत्यसंस्कारासाठी आणतील. RIP वैभवी, "


आज अभिनेता नितेश पांडे याचेही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. तसेच दोन दिवसांपूर्वी अभिनेता आदित्य सिंह राजपूतचाही मृत्यू झाला होता.

Comments
Add Comment

मुंबईतील प्रतिजेजुरी पाहिलीत का? मुंबईतही आहे खंडोबाचे पवित्र देवस्थान

मुंबई : चंपाषष्ठीचा शिवशंकराच्या अवतार मानल्या जाणाऱ्या श्री खंडोबा देवाचा उत्सव राज्यभर मोठ्या भक्तिभावात

शतकातील सर्वात मोठं सूर्यग्रहण; २०२७ मध्ये होणार ६ मिनिटांचा अंधार

मुंबई : येणाऱ्या वर्षात म्हणेजच २ ऑगस्ट २०२७ रोजी शतकातील सर्वात मोठं आणि दुर्मिळ खग्रास सूर्यग्रहण पाहायला

मालाड आणि गोरेगावमधील दोन मनोरंजन मैदानांचा होणार विकास

गोरेगाव पहाडीतील मोकळ्या जागेवर उभारले जाणार मनोरंजन मैदान सरदार वल्लभभाई मनोरंजन मैदानाचे होणार

प्रारुप मतदार यादीवर हरकती, सूचना नोंदवण्यास मुदतवाढ

हरकती आता ३ डिसेंबर २०२५ पर्यंत नोंदवता येणार मागील सात दिवसांत २१६७ हरकती, सूचना नोंदवल्या मुंबई (विशेष

शक्ती वाघाचा मृत्यू न्युमोनियामुळे, शव विच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर

आता राणीबागेत जय आणि करिष्मा वाघाला पाहता येणार मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा (पूर्व)

अतिवृष्टीचे संकट, पण सरकारचा आधार; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला एक वर्षाची स्थगिती

मुंबई : राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली