अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा अपघातात मृत्यू

  596

मुंबई: 'साराभाई वर्सेस साराभाई' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये जॅस्मिनच्या भूमिकेने सर्वांना हसवणारी अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा कार अपघातात मृत्यू झाला. शोचे निर्माते आणि दिग्दर्शक जे. डी. मजेठिया यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत हिमाचल प्रदेशमध्ये हा अपघात झाल्याचे सांगितले. तिच्या अपघाती मृत्यूच्या बातमीने मालिकाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.


याबाबतचे सविस्तर वृत्त असे, वैभवी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत कारने येत होती. अचानक वळणावर कारचे नियंत्रण सुटले आणि कार खड्ड्यात पडली, त्यात वैभवीचा मृत्यू झाला. तिच्या पतीची प्रकृती स्थिर आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती पण शोच्या निर्मात्यांनी बुधवारी याची माहिती दिली.



निर्माते जे. डी. मजेठिया यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, "आयुष्य खूप क्षणभंगूर आहे. साराभाई vs साराभाई मधील 'जॅस्मिन' म्हणून ओळखली जाणारी एक अतिशय चांगली अभिनेत्री, खास मैत्रीण वैभवी उपाध्यायचे निधन झाले. कुटुंबीय तिला उद्या सकाळी ११ वाजता मुंबईत अंत्यसंस्कारासाठी आणतील. RIP वैभवी, "


आज अभिनेता नितेश पांडे याचेही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. तसेच दोन दिवसांपूर्वी अभिनेता आदित्य सिंह राजपूतचाही मृत्यू झाला होता.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही