शेतकऱ्यांना कर्ज दिलं नाही तर बँकेवर गुन्हा दाखल करणार....

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली तंबी


मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर बोलत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांना थेट तंबीच दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना शेत शिवार योजना, शेतकऱ्यांना दिली जाणारी वीज, आणि बँकातून दिल्या जाणाऱ्या कर्जावर भाष्य केले.


ते म्हणाले की, शेतकऱ्यांना शिवसेना-भाजपचे सरकार हे सगळ्या प्रकारची मदत करण्यास तत्पर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटासमोर खचून न जाता शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे टोकाचे पाऊल उचलू नये. तसेच आपल्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे म्हणून अॅग्रीकल्चर फिडरचा सोलरिझेशन करण्यात येत आहे. त्याची सुरुवात २०१८ साली करण्यात आली. मध्यंतरी ही योजना कागदावर होती मात्र आता ही योजना पुन्हा नव्याने सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.


शेतकऱ्यांच्या फायद्याच्या योजना सांगत देवेंद्र फडणवीस यांनी नव्या योजनांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेतत्वावर घेण्यात येणार असून एकरी ५० हजार रुपये प्रतिवर्षी जमीन तीस वर्षाकरिता घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कृषी कर्जाकरिता सिबिलची अट लागू होत नाही हे शॉर्ट टर्म कर्ज असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना बँका कर्ज देत नसतील तर त्यांच्यावर गुन्हा नोंद करा अशा सूचना देणार असल्याचे सांगितले.


यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार कायम उभा असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा कृषीकर्ज न देणाऱ्या बँकांना धारेवर धरत सांगितले की, आता पुन्हा एकदा सांगतो आहे की, शेतकऱ्यांना बँक कर्ज देत नसेल तर त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याच्या सूचना देणार आहे. हे आता खपवून घेतले जाणार नाही, असं म्हणत त्यांनी एकप्रकारे बँकांना तंबीच दिली आहे.

Comments
Add Comment

महापालिकेत पहिले पक्ष कार्यालय मिळवण्यात भाजपने मारली बाजी

शुक्रवारी विधीवत पुजा करून करणार प्रवेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत नगरसेवक निवडून आल्यानंतर

उपायुक्त आणि सहायक आयुक्तांच्या बदल्या आणि बढती

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील सहायक आयुक्त विनायक विसपुते यांना उपायुक्त पदी बढती देण्यात

कचऱ्याच्या जुन्या आणि खराब वाहनांना रस्त्यांवर नो एंट्री

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यात असलेली कचऱ्याची वाहने आता

'पल्स' परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा 'महाराष्ट्र ब्रँड' निर्माण करा - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबईत २७ व २८ मार्च रोजी वैद्यकीय परिषद 'पल्स' चे आयोजन मुंबई : वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला

Dombilvli: डोंबिवलीत शॉरमावालीच्या स्टॉलवर राज ठाकरेंचा फोटो, अविनाश जाधवांनी दिलेला शब्द पाळला

डोंबिवली: मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत शॉरमा विकणाऱ्या एकता सावंत या मराठी व्यावसायिका

एका खटक्यात दादर पूर्व रेल्वे स्थानक परिसर साफ

चोरबाजारासह अनधिकृत फेरीवाले आणि गर्दुल्ल्यांवर कारवाई मुंबई :  दादर पूर्व रेल्वे स्थानकासमोरील जागेत मागील