नवीन पनवेल (प्रतिनिधी) : पनवेल तालुक्यात तब्बल २२ लाख ९४ हजार निधीचा वापर करून बांधलेल्या जलयुक्त शिवारात पाण्याचा एक थेंब देखील शिल्लक नाही. यातील पाणी फेब्रुवारी-मार्च महिन्यातच आटल्यामुळे आदिवासी बांधवाना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. परिणामी आजूबाजूच्या आदिवासी वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई उद्भवली आहे.
तालुक्यातील धोदाणी येथे २६ जानेवारी २०१५ रोजी पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते जलशिवार योजनेचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर काम पूर्ण करण्यात आले. मालडुंगे, धोदाणी, धामणी, देहरंग, आदी गाव परिसरात उन्हाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. माथेरानच्या डोंगरावरून वाहून येणारे पाणी गाढी नदीतून खाडीला जाऊन मिळते.
पाणी जिरत नसल्याने बहुतांशी गावात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण होते. यावर मात करण्यासाठी जवळपास २३ लाख रुपये खर्च करून जलयुक्त शिवार बांधण्यात आले. या जलयुक्त शिवारात पावसाळा संपल्यावर पाणीच शिल्लक राहत नसल्याचे येथील आदिवासी बांधवांनी सांगितले. जलयुक्त अभियानांतर्गत पनवेल तालुक्यातील धोदाणी परिसरात पाणी जिरवण्यासाठी बंधारे बांधण्याच्या कामाला २०१५ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. मात्र यातील पाणी फेब्रुवारी-मार्च महिन्यातच आटल्यामुळे आदिवासी बांधवांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबलेली नाही.
पाण्यासाठी वणवण; फार्म हाऊसना मात्र मिळते पाणी!
महिलांना दोन ते तीन किलोमीटर पायी चालत जाऊन पाणी आणावे लागते. पुरुष व महिला दोघांनाही मोलमजुरीवर पाणी सोडून पाण्यासाठी वणवण करावी लागते. पनवेल शहर, नवीन पनवेलला पाण्याचा पुरवठा करणारे देहरंग धरण ज्या हद्दीत आहे, त्या हद्दीतील वाड्यांना या धरणाचे पाणी चाखायला देखील मिळत नाही.
पंचांग आज मिती ज्येष्ठ कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा. योग शोभन. चंद्र राशी…
ज्या अर्थसंकल्पाची महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता व आतुरता होती, तो अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार…
रवींद्र तांबे केंद्रात सरकार स्थापन झाले की, सर्वांचे लक्ष लागलेले असते ते म्हणजे देशाच्या केंद्रीय…
हरीश बुटले, करिअर सल्लागार पेपरफुटी किंवा सॉल्व्हर गँग हे समाजकंटक आणि नतद्रष्ट लोकांचे काम आहे…
मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) सुरू होण्याआधीच या स्पर्धेसाठी एकूण…
मुंबई: जिओ(jio) आणि एअरटेलने(airtel) आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. कंपन्यांनी आपले प्लान्स…