सर्व शाळांसाठी आता एकच गणवेश

  119

राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली घोषणा


मुंबई : राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शालेय गणवेशाबाबत आज एक मोठी घोषणा केली. राज्यातील सर्व सरकारी व अनुदानित शाळांचे गणवेश हे एकच असतील व या शैक्षणिक वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ती घोषणा आहे. अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेली 'एक राज्य, एक गणवेश' ही संकल्पना यावर्षीपासून अस्तित्त्वात येणार आहे.


राज्य सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात मोफत गणवेशासाठी निधीची तरतूद केली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्वच शाळांचा एकाच प्रकारचा गणवेश असेल असा निर्णय दिला आहे. या गणवेशात मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची पँट असेल. यामुळे राज्यातील ६४,२८,००० विद्यार्थी आता एकाच गणवेशात दिसतील.


यावर्षीपासून राज्य सरकार ही संकल्पना अस्तित्त्वात आणत आहे. मात्र काही शाळांनी आधीच गणवेशाची ऑर्डर दिल्यामुळे त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी एक निर्णय घेण्यात आला आहे. या शाळांच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातील पहिले तीन दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार व बुधवार त्यांच्या शाळांनी नियोजित केलेला गणवेश घालावा लागेल व नंतरचे तीन दिवस म्हणजे गुरुवार, शुक्रवार व शनिवार राज्याचा एक गणवेश घालावा लागेल, अशी माहिती दीपक केसरकरांनी दिली.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक