महिला सन्मान योजनेतून एसटीला ९ कोटींचे उत्पन्न

रत्नागिरी (प्रतिनिधी): संपूर्ण राज्यात दि. १७ मार्चपासून सरकारने एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के तिकीट सवलत ‘महिला सन्मान योजना’ म्हणून जाहीर केली. या योजनेमुळे आता महाराष्ट्रात सगळीकडेच एस.टी.ने प्रवास करणाऱ्यांची संख्या १० ते २० पटीत वाढली आहे. परिणामी रत्नागिरी एसटी विभागाचे उत्पन्न भरघोस वाढले आहे. तीन महिन्यात ४६ लाख ३६९३ महिला प्रवाशांनी एसटी ने प्रवास केला असून यातून तब्बल ९ कोटी ३२ लाख ४६ हजार २५२ इतके उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.



राज्य शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात ‘महिला सन्मान योजना’ घोषित करून राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीमधील प्रवासात महिला व मुलींना तिकिटात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला.



या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी १७ मार्चपासून सुरू झाली आहे. त्याच दिवसापासून महिला प्रवाशांची ‘एसटी’त गर्दी वाढली आहे. अर्थात आता बसमध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांचीच गर्दी अधिक पाहावयास मिळत आहे. एसटीत चढण्यासाठी महिलांची सगळीकडे चढाओढ दिसून येत आहे, एकीकडे कोरोना काळानंतर एसटी बॅकफूट वर आली होती, कर्जाच्या बोज्याखाली एसटी महामंडळ मार्गक्रमण करत होती, मात्र मार्च २०२३ मध्ये ही योजना लागू केल्या नंतर आता बस मध्ये जागा मिळवण्यासाठी महिलांची बाचाबाची सुद्दा होत असल्याच्या घटना सध्या घडत आहेत. त्यातच आता थेट खिडकीतून जागा पकडण्यासाठी कसरती महिला प्रवाशी करू लागल्या आहेत. रत्नागिरी एसटी विभागाला महिला प्रवाशांमुळे तब्बल ९ कोटी ३२ लाख ४६ हजार इतके उत्पन्न १६ मेपर्यंत प्राप्त झाले आहे.

Comments
Add Comment

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका