एकविरा देवीवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

नवीन पनवेल (प्रतिनिधी) : महाराष्ट्राची कुलदेवी म्हणजे लोणावळा येथील एकवीरा देवी. ९ मे रोजी पूजा साळवे व शैलेश शेंडगे नामक युजर्सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इन्सटाग्रामवर आई एकविराबद्दल आक्षेपार्ह विधान करून पोस्ट टाकली. त्यामुळे ठाणे, पालघर, मुंबई, रायगड येथील एकविरा देवीवर श्रद्धा असलेल्या भक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अनेक एकविरा देवीच्या भक्तांनी या युजर्सवर कारवाई करण्याची मागणी केली असून, त्या संदर्भातील निवेदन संबंधित पोलीसस्टेशनमध्ये दिले आहे.



खारघरमधील वेसू देवी युवा मित्र मंडळातील कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन खारघर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना दिले. तसेच ठाण्यातून रूपेश तरे आणि वसईतून गणेश बाळकृष्ण पाटील यांनी या दोन भक्तजनांनी तक्रार दाखल केली. तसेच दोषीवर कारवाई करण्यासाठी पनवेल कोळीवाडा येथील कोळी बांधव एकत्र आले होते. त्यांनी कारवाई करण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. इंस्टाग्राम या समाजमाध्यमावर केलेले आक्षेपार्ह व वादग्रस्त विधान लक्षात घेऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहर पोलीस यांच्याकडे करण्यात आली आहे. लोणावळा येथील कार्ला गड निवासिनी असलेली एकवीरा देवीच्या दर्शनाला राज्यभरातूनच नव्हे, तर जगभरातून भाविक आणि पर्यटक दर्शनासाठी येत असतात.

Comments
Add Comment

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या