धोकादायक प्रवास

उरण (प्रतिनिधी) : उरण ते मुंबई हा जलप्रवास जरी प्रवाशांसाठी सोयीचा मार्ग असला तरी मोरा बंदरावर ये-जा करण्यासाठी असलेल्या जेट्टीच्या दुरवस्थेमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. या जेट्टीवरील संरक्षक कठडे अनेक ठिकाणी तुटले असून वीज ही नसल्यामुळे रात्रीचा प्रवास करणे हे प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. याशिवाय बंदरावरून प्रवास करणार्या प्रवाशांच्या वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था नसल्याने अर्धा किलोमीटरपेक्षा अधिकचे अंतर असलेल्या या जेट्टीवर अनेक अडथळ्यांचा प्रवास हजारो प्रवाशांना करावा लागत आहे. त्यामुळे सुखकर जलवाहतुकीचे मोरा आता समस्यांचे बंदर बनले आहे.



मोरा बंदर ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यान अर्धा ते पाऊण तासांचे अंतर असलेला जलमार्ग आहे. या जलमार्गावरून प्रवास करण्यासाठी ‘महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डा’कडून मोरा जेट्टी बांधण्यात आली आहे. या जेट्टीची दुरवस्था झाली असून समुद्रात असलेल्या या जेट्टीच्या मार्गावरील ये-जा करण्यासाठी असलेले संरक्षक लोखंडी पाइप, असलेले कठडे तुटलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे बंदरावर जात असताना येणाऱ्यावादळी वाऱ्यांमुळे प्रवाशांच्या जीविताला धोका उद्भवण्याची शक्यता आहे. शिवाय रात्रीच्या वेळी जेट्टीवरील विजेची सोय विस्कळीत असल्याने बहुतांश वेळा दिव्याखाली अंधारच असतो. त्याचबरोबर या जेट्टीवर मासळी पकडण्यासाठी वापरण्यात येणारे जाळे दुरुस्तीचे कामदेखील सुरू असल्याने त्याचा नाहक त्रास प्रवाशांना होतो.



तसेच बंदर विभागाने या ठिकाणी वाहनांना बंदी घातली असूनदेखील जेट्टीवरच दुचाकी उभ्या केल्या जात असल्याने हे बंदर अनेक असुविधांनी ग्रासलेले आहे.

Comments
Add Comment

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी