नमन, जाखडी लोककलांना मिळणार राजाश्रय

चिपळूण (प्रतिनिधी) : आमदार शेखर निकम यांनी कोकणातील नमन व जाखडी या लोककलांना राजाश्रय मिळावा, यासाठी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला होता. या पार्श्वभूमीवर आता नमन, जाखडी लोककलांना राजाश्रय मिळण्याची शक्यता आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यात गांभीर्याने लक्ष घतले असून लवकर याबाबत बैठक घेऊन हा महत्त्वाचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.



कोकणातील दशावतार वगळता नमन, जाखडी अशा महत्त्वाच्या लोककलांना राजाश्रय नाही. यामुळे नमन, जाखडी अशी अनेक मंडळे आज लोकांचे मनोरंजन करीत असताना, कोकणातील या लोककला अनेक कलाकार जपत असताना त्यांची अडचण होत आहे. नमन, जाखडी मंडळांना अनुदान मिळत नाही, कलाकारांना कसल्याही प्रकारच्या सुविधा अथवा मानधन मिळत नाही. या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी चिपळूण येथे झालेल्या लोककला महोत्सवात नमन, जाखडी या लोककलांना राजाश्रय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने हा कोकणच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय पावसाळी अधिवेशनात मांडला. त्याला आता मूर्त रूप येण्याची चिन्हे दिसत आहेत.



सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी आ. शेखर निकम यांना १५ मे रोजीच्या पत्राने या विषायासंदर्भात उत्तर दिले आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव यांच्याकडे आपण हा विषय कार्यवाहीसाठी पाठविल्याचे मुनगंटीवार यांनी कळविले आहे. तसेच या संदर्भात लवकरच मंत्रालयात बैठक घेण्याचे जाहीर केले आहे.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात