आंबा आलाय सामान्यांच्या आवाक्यात

नवी मुंबई (वार्ताहर) : वातावरणातील उष्मा वाढत आहे. त्यामुळे फळे लवकर पिकून तयार होत आहेत. याच पार्श्वभूमीवर बाजारात आंब्यांची आवकही वाढत आहे. परिणामी बाजारात सर्वच ठिकाणांच्या आंब्यांचे दर घसरले आहेत. अगदी हापूस आंब्यापासून दक्षिण भारत, गुजरातकडील आंब्यांचे दरही कमी झाले आहेत. त्यामुळे खवय्यांना आंब्यांचा मनसोक्त आस्वाद घेता येणार आहे.



यावर्षी लहरी हवामानाचा फटका बसल्याने, सर्वच ठिकाणांच्या आंब्याला मोठा फटका बसला होता. त्यामुळे बाजारात आंबा तुलनेने कमीच होता. त्यातही कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन १७ ते १८ टक्क्यांवर आले. या आंब्याचे दर एक हजार रुपये डझनच्या घरात गेले होते. हापूस कमी प्रमाणात असल्याने, त्याला पर्याय म्हणून हापूससारख्या दिसणाऱ्या कर्नाटकी आंब्यांकडे ग्राहकांनी मोर्चा वळवला होता. त्याचपाठोपाठ इतर जातींच्या म्हणजेच बदामी, केसर, लालबाग, तोतापुरी या आंब्यांकडे ग्राहकांचा कल होता. त्यामुळे या आंब्यांच्या दरातही वाढ झाली होती. म्हणूनच एप्रिल आणि मे महिन्याची सुरुवात या आंब्याच्या मुख्य हंगामाच्या काळातही आंबा खरेदी करण्यास ग्राहक फारसे उत्सुक नव्हते. आता १० मेपासून सर्वच ठिकाणांच्या आंब्यांची आवक बाजारात वाढू लागली आहे. यात प्रामुख्याने कोकणातील हापूस आंब्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे हापूसचे दर कमी झाले असून, त्यांच्यापाठोपाठ इतर आंब्यांच्या दरात घसरण झाली आहे. आंबा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे.


आताचे घाऊक दर                             पूर्वीचे दर

हापूस आंबा ५०० ते १००० रु. डझन        १००० ते १२०० रु.
कर्नाटक आंबे ५० रु ते १०० रु. किलो      ८० ते १५० रु.
बदामी ३० ते ८० रु. किलो                  ७० ते १२० रु.
लालबाग ३० ते ५० रु. किलो               ५० ते १०० रु.
केसर - ५० ते १०० रु. किलो               ८० ते १२० रु.
तोतापुरी - ३० ते ६० रु. किलो             ५० ते ७० रु.
Comments
Add Comment

पुण्यातील कचरावेचक कामगार अंजू माने यांनी १० लाखांची बॅग परत करून दिला मानवतेचा संदेश

पुणे : जिथे दैनंदिन जीवनात पैशासाठी लोक अनेकदा अनैतिक मार्ग स्वीकारताना दिसतात, तिथे पुण्यातील एका मेहनती

Local Train Block : मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवसांचा ब्लॉक! चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी: 'या' लोकल रद्द, घरातून निघण्यापूर्वी 'हे' वेळापत्रक तपासा!

मुंबई : मुंबईच्या लाखो चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. रेल्वे

Mahim Station Fire : हार्बर लाईन सेवा ठप्प! माहिम रेल्वेस्थानकाजवळ नवरंग कंपाऊंडमध्ये मोठी आग; लोकल वाहतुकीवर परिणाम, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात आज, २२ नोव्हेंबर रोजी माहिम रेल्वे स्थानकाजवळ एक मोठी आग लागल्याची गंभीर घटना

भायखळ्यात उबाठा आणि शिवसेनेतच होणार लढाई, कोणत्या जागांवर असेल, कुणाचा पत्ता कापला जाणार? जाणून घ्या

मुंबई (सचिन धानजी) : दक्षिण मुंबईतील भायखळा विधानसभेत उबाठाचे मनोज जामसूतकर हे आमदार म्हणून निवडून आले. लोकसभा

पवई तलावातील जल प्रदूषण रोखणार, ईस्ट इंडिया कंपनीची महापालिकेने केली निवड

मुंबई (सचिन धानजी): पवई तलावात होणारे मलमिश्रित सांडपाण्याचे प्रदुषण कमी करण्यासाठी आता पवई येथील सध्या बंद

महापालिका निवडणूक प्रभाग आरक्षणावर आल्या फक्त १२९ हरकती सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकी करता प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती.