आधार जोडणीतील तांत्रिक बाबी दूर करा; पण प्रवेश नाकारू नका

  92

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेली आधार जोडणीची वाढीव मुदत उद्या १५ मे रोजी संपणार आहे. मात्र त्यानंतरही काही तांत्रिक चुका असल्यास मुलांचे शाळा प्रवेश नाकारू नये. आधारमध्ये काही तांत्रिक बाबी असतील तर त्या दूर कराव्यात, असे निर्देश राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत.



राज्यांमधील प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव आणि आधार सकट त्याची माहिती 'सरल' संकेतस्थळावर जोडली गेली पाहिजे, असा नियम शिक्षण विभागाने घालून दिला होता. याची जोडणी करण्याची मुदत ३० एप्रिलपर्यंत होती; मात्र ती वाढवून १५ मे पर्यंत करण्यात आली आहे. तरीही तांत्रिक चुका असल्यास मुलांचे शाळा प्रवेश नाकारू नये. आधारमध्ये काही तांत्रिक बाबी असतील तर त्या दूर कराव्या, असे निर्देश शासनाने दिले आहेत.



ही मुदत अपुरी असून ती वाढवून दिली पाहिजे. तरच विद्यार्थ्यांची राहिलेली आधार जोडणी पूर्ण होईल; कारण यामध्ये महत्त्वाचा तांत्रिक दोष असून विद्यार्थ्यांच्या 'डेटा'ची नोंदणी होत नाही. त्यामुळे तो दोष निर्माण होतो. एक तर 'मॅन्युअल' पद्धतीने काही ठिकाणी ही प्रक्रिया राबवावी आणि तेवढे विद्यार्थी शासनाने गृहीत धरावे, अशी मागणी महाराष्ट्र शिक्षण परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी केली.

Comments
Add Comment

जरांगेंनी उपोषण सोडले, फडणवीस सरकारने ६ मागण्या केल्या मान्य; मराठ्यांचा विजय

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आले. जरांगे यांनी मंगळवारी पाच दिवसांपासून सुरु

मेट्रो-४ मार्गिकेच्या कामाला गती, गर्डरचे काम पूर्ण

मुंबई : बहुप्रतीक्षित ठाणे मेट्रो प्रकल्पातील सहा स्थानकांसाठी आवश्यक असलेले गार्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले.

एसटी महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींचा त्वरित वापर करण्यास मान्यता

मुंबई : राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी. महामंडळ) ताब्यातील अतिरिक्त जमिनींच्या

जरांगेंचा मोठा विजय... हैदराबाद गॅझेट लागू होणार; सर्व मागण्या झाल्या मान्य!

राज्य सरकार कडून जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू मुंबई: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या

Maratha Reservation: विखे पाटील अंतिम मसुदा घेऊन जरांगेंना भेटले, आजच होणार मोठा निर्णय!

मुंबई: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांचे गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत आमरण

भगव्याच्या मदतीला हिरवे?... "जरांगेना पोलिसांनी हाथ लावल्यास मुस्लिम समाज रस्त्यावर उतरेल" जलील यांचा मुंबई पोलिसांना इशारा!

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत