ठाकरेंना संपवायचे हेच राऊत पाहताहेत

कणकवली (प्रतिनिधी) : ‘ज्या व्यक्तीने कधी सरपंच पदाची साधी निवडणूक लढविलेली नाही, ते संजय राजाराम राऊत हे कर्नाटक निवडणूक निकालावर भाष्य करत आहेत. हा प्रकारच हास्यास्पद आहे’, अशी खोचक टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. कणकवली येथील प्रहार भवन येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, संजय राऊत यांच्या आरोपांना त्यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर देखील दिले. कर्नाटक निवडणुकीत महाराष्ट्र एकिकरण समितीला एकही जागा मिळालेली नाही. याबाबत संजय राऊत यांना त्यांनी टोला लगावला. ‘राहुल गांधींबरोबर तुमचे चांगले संबंध होते ना, मग त्यांना सांगायचे होते की महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार देऊ नका. खरं म्हणजे राहुल गांधी, सोनिया गांधी तुमची काय किंमत करतात ते एकदा नाना पटोलेंकडून ऐकून घ्या’, असे ते म्हणाले.



‘ज्यांना निवडणूक म्हणजे काय हे समजते, राजकारण म्हणजे काय हे समजते, ते लोक या संजय राऊत सारखे लगेच बोलणार नाहीत. लोकप्रभात असताना संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल जेवढे काही घाणेरडे बोलायचे, तेच संजय राजाराम राऊत आता त्यांचा मालकाचे दुकान बंद करण्याच्या प्रयत्नात आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारासाठी संजय राऊत तिकडे गेले होते, तिथे काय झाले ? ते सांगा. काँग्रेसच्या उमेदवारांमुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार पराभूत झाल्याचे देखील आमदार नितेश राणे यांनी सांगितले.



‘कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे की, अपात्रतेचा निर्णय अध्यक्ष घेणार. मग हेच महाशय त्यांच्यावरच टीका करतात. अध्यक्षांना चिडवायचे, जेणेकरून उद्धव ठाकरे यांना अजून कसा संपवू शकतो हे संजय राऊत पाहत आहेत. समीर वानखेडेंवर सीबीआयची धाड पडली त्यावर बोलताना आ. राणे म्हणाले की, असेच भ्रष्ट अधिकारी संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना लागतात. समीर वानखेडे यांनी चुकीचे काय केले असेल, तर कारवाई होणारच, असेही आमदार राणे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच संजय राऊत यांना, तुमचे मालक मुख्यमंत्री असताना सचिन वाझे याला परत सेवेत रुजू करून का घेतले होते? वाझेंना कितीच टार्गेट दिले होते? सचिन वाझे आठवड्यातून पाच दिवस वर्षा बंगल्यावर राहायचा. दिशा सालीयनच्या घरी जी मर्सिडीज पाठवली गेली ती सचिन वाझेंचीच होती. त्या रात्री आदित्य ठाकरेंचे सचिन वाझेला किती फोन गेले, याचे उत्तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी द्यावे, अशी मागणीही आ. नितेश राणे यांनी केली आहे.

Comments
Add Comment

IND vs ENG T20I : भारत विरुद्ध इंग्लंड चौथा टी-20 आज; सामना किती वाजता, कुठे पाहाल? जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० (T20I) मालिकेतील चौथा सामना गुरुवार, ९ जुलै रोजी ब्रिस्टल

Rainfall Deficit : देशात पावसाची एकूण तूट 24 टक्क्यांवर, आतापर्यंत 350 लाख हेक्टरवर खरीप पेरणी पूर्ण

नवी दिल्ली : एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे नैऋत्य मोसमी पावसाच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान

Nagpur BRICS Summit 2026 : नागपूरमध्ये ११ जुलैपासून ब्रिक्स परिवहन मंत्र्यांची तिसरी बैठक

- जागतिक परिवहन सहकार्य, शाश्वत विकास आणि नव्या तंत्रज्ञानावर होणार मंथन नागपूर : भारताच्या ब्रिक्स २०२६

Donald Trump : युद्धविराम संपुष्टात, इराणवर पुन्हा जोरदार हल्ला करू - ट्रम्प

अंकारा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी बुधवारी सांगितले की, अमेरिका इराणवर आणखी एका

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावरून औषधांच्या आयातीस परवानगी

- औषधांच्या आयातीसाठी अधिसूचित प्रवेश बंदरांची एकूण संख्या ४२ वर नवी दिल्ली : औषध पुरवठा साखळी बळकट करण्याच्या

Rajasthan Gang-Rape Case : राजस्थानातील सामूहिक बलात्कार प्रकरणी एनसीडब्ल्यूचे 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

नवी दिल्ली : राजस्थानातील श्रीगंगानगर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्कार आणि मानवी तस्करी