खरी शिवसेना कोणाची हे पुन्हा न्यायालयीन फेऱ्यात?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने गुरुवारी शिवसेनेच्या १६ आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला असला तरी खरी शिवसेना कोणती? हे ठरविण्याची प्रक्रिया पुन्हा न्यायालयाच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचप्रमाणे न्यायालयाने निर्णयासाठी कोणताही कालावधी निश्चित केलेला नाही. यामुळेही या सर्व प्रक्रियेत या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दाच लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



सत्तासंघर्षाच्या निकालादरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने गुरुवारी आमदारांच्या निलबंनाच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांना म्हणजेच राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायला सांगितले आहे. त्यानुसार, विधानसभा अध्यक्षांना हा निर्णय घेण्यापूर्वी खरी शिवसेना कोणाची हे निश्चित करावे लागणार आहे. याकरीता निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या पक्षाची मूळ घटना, त्यातील अटी आणि नियम तसेच पक्षाच्या नेतृत्वाची रचना विचारात घ्यावी लागेल. शिवसेनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उद्धव ठाकरे, असा दोघांनीही दावा केला आहे.



केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष तसेच पक्षाचे चिन्ह शिंदे यांच्या गटाकडे दिले आहे. ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याला आव्हान दिले आहे. न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली नसली तरी यावर अंतिम निर्णय दिलेला नाही. खरी शिवसेना ठरविताना अध्यक्ष नार्वेकर यांचे कौशल्य पणाला लागणार आहे. त्यानंतरही अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतला, तरी दुसरा गट तो मान्य करणार नाहीत व पुन्हा हे प्रकरण न्यायालयाच्या दारात जाणार, हे निश्चित मानले जात आहे.

Comments
Add Comment

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय

Bhondubaba Ashok Kharat : भोंदू खरातविरोधात तक्रारींचा महापूर, लैंगिक शोषणाचे आणखी ११ आरोप

मुंबई : वासनांध अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तक्रारींची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

Bmc News, Andheri Subway : अंधेरी सब वे मधील पावसाचे तुंबणारे पाणी,  महापौरांनी  रेल्वेशी समन्वय राखून गती देण्याचे महापालिकेला दिले निर्देश

मुंबई : अंधेरी भूयारी मार्ग हा अतिसखल परिसर असल्याने पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर

Bmc News : मुंबईत यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या गेल्या कुठे? महापालिका प्रशासनावर स्थायी समितीची प्रश्नांची सरबती

खासगी कंत्राटदार कचरा पेट्या देणार तर अधिक पेट्यांची खरेदी कशाला? पेट्या खरेदीचा प्रस्ताव अध्यक्षांनी ठेवला

Mankhurd News : मानखुर्दमधील १४०० अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

बॉम्बे सोप फॅक्टरीच्या जागेवरील अतिक्रमणाचा डाव हाणून पडला महानगरपालिका आणि उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय