खरी शिवसेना कोणाची हे पुन्हा न्यायालयीन फेऱ्यात?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने गुरुवारी शिवसेनेच्या १६ आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला असला तरी खरी शिवसेना कोणती? हे ठरविण्याची प्रक्रिया पुन्हा न्यायालयाच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचप्रमाणे न्यायालयाने निर्णयासाठी कोणताही कालावधी निश्चित केलेला नाही. यामुळेही या सर्व प्रक्रियेत या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दाच लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



सत्तासंघर्षाच्या निकालादरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने गुरुवारी आमदारांच्या निलबंनाच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांना म्हणजेच राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायला सांगितले आहे. त्यानुसार, विधानसभा अध्यक्षांना हा निर्णय घेण्यापूर्वी खरी शिवसेना कोणाची हे निश्चित करावे लागणार आहे. याकरीता निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या पक्षाची मूळ घटना, त्यातील अटी आणि नियम तसेच पक्षाच्या नेतृत्वाची रचना विचारात घ्यावी लागेल. शिवसेनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उद्धव ठाकरे, असा दोघांनीही दावा केला आहे.



केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष तसेच पक्षाचे चिन्ह शिंदे यांच्या गटाकडे दिले आहे. ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याला आव्हान दिले आहे. न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली नसली तरी यावर अंतिम निर्णय दिलेला नाही. खरी शिवसेना ठरविताना अध्यक्ष नार्वेकर यांचे कौशल्य पणाला लागणार आहे. त्यानंतरही अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतला, तरी दुसरा गट तो मान्य करणार नाहीत व पुन्हा हे प्रकरण न्यायालयाच्या दारात जाणार, हे निश्चित मानले जात आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी