कर्नाटकात भलेही विजय पण 'या' महत्वाच्या राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ

विधानसभा पोटनिवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपची मुसंडी


रामपूर: कर्नाटकातील निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपला हार पत्करावी लागली असली तरी सर्वात मोठे आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचे राज्य उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने सपा, काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा पोटनिवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, सपाला विधानसभा सीट, नगरपालिकांसह पंचायत समित्यादेखील गमवाव्या लागल्या आहेत.


सपाच्या आझम खान यांच्या रिक्त झालेल्या रामपूरमधील स्वार टांडा पोटनिवडणुकीतील सीटवर भाजपासोबत असलेल्या अपना दलाचे शफीक अंसारी जिंकले आहेत. सपाने ही जागा वाचविण्यासाठी हिंदू उमेदवार दिला होता. मात्र, अनुराधा चौहान यांचा ९ हजार ७३४ मतांनी पराभव झाला आहे. भाजपाने आझम खान यांची लोकसभेची रामपूर सीटही आपल्या ताब्यात घेतली होती. तसेच त्यानंतर विधानसभेची सीटही ताब्यात घेतली होती.


तर, दुसरीकडे नगर परिषद, नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या महापौरपदाच्या, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकांतही भाजपाने सपा, काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. १७ पैकी १७ नगर परिषदांवर भाजपाचा विजय झाला आहे. तर १९९ नगर पालिकांपैकी भाजपाने ८८, सपाने ३५, काँग्रेस ५, बसपा २१ आणि इतर ५० जिंकल्या आहेत. तर ५४४ नगर पंचायतींपैकी भाजपाने आपल्याकडे १६९ पंचायतीवर विजय प्राप्त केला आहे. सपाने ७२, काँग्रेस ७, बसपा ३५ आणि इतर १५० जिंकल्या आहेत. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस जिंकली असली तरी उत्तरेत काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे.

Comments
Add Comment

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला

इराण युद्धामुळे भरपूर नफा ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा नवी दिल्ली  : ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात