नैतिकता शिल्लक असेल, तर ठाकरेंनी आमदारकीचाही राजीनामा द्यावा

आमदार नितेश राणे यांचे आव्हान


कणकवली (प्रतिनिधी) : संजय राऊत यांची पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल होईल आणि ते पुन्हा जेलमध्ये जातील, तर उद्धव ठाकरे यांच्याकडे थोडीतरी नैतिकता शिल्लक असेल, तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले. कणकवली येथील प्रहार भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.



पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत, अनिल देसाई आणि अनिल परब यांच्यामुळे ठाकरे गट संपला. अनिल देसाई काल कुठे होते? राऊतांनी आरे गेस्ट हाऊसमध्ये काय झाले हे महाराष्ट्राच्या जनतेला जरा सांगावे? नैतिकतेच्या गोष्टींवर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे, संजय राऊत नैतिकतेची भाषा करताहेत. त्यांना विचारायचे आहे, अधिकृत शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आहे. उबाठा हे नाव कोर्टाने तात्पुरते दिले होते. उद्धव ठाकरेंना पक्षाचे वेगळे नाव आणि चिन्ह निवडावेच लागणार आहे. जेव्हा उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तेव्हा फेसबुक लाइव्ह केले होत त्याची क्लिप जनतेने पहावी तसेच त्याची आठवण उद्धव ठाकरेंना करून देताना नितेश राणे म्हणाले की, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि आमदारपदाचा राजीनामा देतो, असे म्हटले होते. मग अजून आमदारकीचा राजीनामा का दिला नाही? तुमच्यात खरीच नैतिकता असेल, तर आमदारकीचाही राजीनामा द्या.



पुढे नितेश राणे म्हणाले की, नैतिकतेची भाषा तुम्ही करता. मुळात नैतिकतेच्या गोष्टी उद्धव ठाकरेंना शोभत नाहीत. २०१४ ते २०१९ पर्यंत देवेंद्र फडणवीसांनी लाड पुरविले आणि २०१९ नंतर याच उद्धव ठाकरेंनी घात केला. त्यामुळे त्यांना नैतिकतेच्या गोष्टी शोभत नाहीत त्यांनी आमदारकीचा राजीनामाच द्यावा. संजय राऊत ज्या शिवसेनेच्या आमदारांच्या मतांवर खासदार झाले त्या खासदारकीचा पहिला राजीनामा द्या. मग बघू तुमची नैतिकता..! तीन महिन्यांत हे सरकार कोसळणार, असे उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी महिन्यात सांगितले होते. मात्र आता मे महिना आहे. काय झालं? माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींमुळे उद्धव ठाकरे आमदार झाले आहेत, हे देखील त्यांनी विसरू नये, असे नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी

IRCTC Website Crash : ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! तिकीट बुक होता होईना, IRCTC वेबसाइट आणि ॲप अचानक ठप्प

दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची मोठी गैरसोय दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना आज एक मोठी तांत्रिक

सिंधुदुर्गात एसटी बसच्या संख्या वाढवा

मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे

सिंधुदुर्गात वाड्या, रस्त्यांच्या जातीवाचक नावांऐवजी आता महापुरुषांची नावे

नावे बदलणारा राज्यातील पहिला जिल्हा कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक