नैतिकता शिल्लक असेल, तर ठाकरेंनी आमदारकीचाही राजीनामा द्यावा

आमदार नितेश राणे यांचे आव्हान


कणकवली (प्रतिनिधी) : संजय राऊत यांची पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल होईल आणि ते पुन्हा जेलमध्ये जातील, तर उद्धव ठाकरे यांच्याकडे थोडीतरी नैतिकता शिल्लक असेल, तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले. कणकवली येथील प्रहार भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.



पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत, अनिल देसाई आणि अनिल परब यांच्यामुळे ठाकरे गट संपला. अनिल देसाई काल कुठे होते? राऊतांनी आरे गेस्ट हाऊसमध्ये काय झाले हे महाराष्ट्राच्या जनतेला जरा सांगावे? नैतिकतेच्या गोष्टींवर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे, संजय राऊत नैतिकतेची भाषा करताहेत. त्यांना विचारायचे आहे, अधिकृत शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आहे. उबाठा हे नाव कोर्टाने तात्पुरते दिले होते. उद्धव ठाकरेंना पक्षाचे वेगळे नाव आणि चिन्ह निवडावेच लागणार आहे. जेव्हा उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तेव्हा फेसबुक लाइव्ह केले होत त्याची क्लिप जनतेने पहावी तसेच त्याची आठवण उद्धव ठाकरेंना करून देताना नितेश राणे म्हणाले की, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि आमदारपदाचा राजीनामा देतो, असे म्हटले होते. मग अजून आमदारकीचा राजीनामा का दिला नाही? तुमच्यात खरीच नैतिकता असेल, तर आमदारकीचाही राजीनामा द्या.



पुढे नितेश राणे म्हणाले की, नैतिकतेची भाषा तुम्ही करता. मुळात नैतिकतेच्या गोष्टी उद्धव ठाकरेंना शोभत नाहीत. २०१४ ते २०१९ पर्यंत देवेंद्र फडणवीसांनी लाड पुरविले आणि २०१९ नंतर याच उद्धव ठाकरेंनी घात केला. त्यामुळे त्यांना नैतिकतेच्या गोष्टी शोभत नाहीत त्यांनी आमदारकीचा राजीनामाच द्यावा. संजय राऊत ज्या शिवसेनेच्या आमदारांच्या मतांवर खासदार झाले त्या खासदारकीचा पहिला राजीनामा द्या. मग बघू तुमची नैतिकता..! तीन महिन्यांत हे सरकार कोसळणार, असे उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी महिन्यात सांगितले होते. मात्र आता मे महिना आहे. काय झालं? माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींमुळे उद्धव ठाकरे आमदार झाले आहेत, हे देखील त्यांनी विसरू नये, असे नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका