RTE प्रवेशाची मुदत १५ मेपर्यंत वाढवली

मुंबई : RTE अंतर्गत खाजगी शाळांमध्ये राखीव प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेची मुदत १५ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. १५ मे २०२३ रोजी रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. विहित मुदतीमध्ये राज्यभरातून फक्त ४८,०१२ बालकांच्या प्रवेशाची नोंद झाली. तब्बल ५३,८३४ जागा रिक्त आहेत. ८ मेपर्यंत दिलेल्या मुदतीत जेमतेम निम्म्या जागाच भरल्याने आता मुदतवाढ देण्यात आली आहे.


शिक्षण हक्क कायद्यानुसार, वंचित घटकांसाठी खाजगी शाळांमध्ये आरक्षित असलेल्या २५ टक्के जागांसाठी मार्च महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. ५ एप्रिल रोजी आरटीई प्रवेशाची लॉटरी जाहीर केल्यानंतर प्रत्यक्षात प्रवेशाची प्रक्रिया ही १३ एप्रिलपासून सुरू झाली. मात्र आरटीईचे संकेतस्थळ संथ गतीने सुरु होते. अनेक तांत्रिक अडचणींमुळे असंख्य पालकांना प्रवेश घेण्यासाठी अडचणी आल्या होत्या. त्यामुळे शिक्षण संचालकांनी हे प्रवेश घेण्यासाठी सोमवारी ८ मे पर्यंत मुदत दिली होती.


मात्र त्यानंतरही हजारो जागांवरील प्रवेश अद्यापही होऊ शकले नसल्याने पुन्हा एकदा १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर वेटिंग लिस्टमधील मुलांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली जाईल.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात