RTE प्रवेशाची मुदत १५ मेपर्यंत वाढवली

मुंबई : RTE अंतर्गत खाजगी शाळांमध्ये राखीव प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेची मुदत १५ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. १५ मे २०२३ रोजी रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. विहित मुदतीमध्ये राज्यभरातून फक्त ४८,०१२ बालकांच्या प्रवेशाची नोंद झाली. तब्बल ५३,८३४ जागा रिक्त आहेत. ८ मेपर्यंत दिलेल्या मुदतीत जेमतेम निम्म्या जागाच भरल्याने आता मुदतवाढ देण्यात आली आहे.


शिक्षण हक्क कायद्यानुसार, वंचित घटकांसाठी खाजगी शाळांमध्ये आरक्षित असलेल्या २५ टक्के जागांसाठी मार्च महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. ५ एप्रिल रोजी आरटीई प्रवेशाची लॉटरी जाहीर केल्यानंतर प्रत्यक्षात प्रवेशाची प्रक्रिया ही १३ एप्रिलपासून सुरू झाली. मात्र आरटीईचे संकेतस्थळ संथ गतीने सुरु होते. अनेक तांत्रिक अडचणींमुळे असंख्य पालकांना प्रवेश घेण्यासाठी अडचणी आल्या होत्या. त्यामुळे शिक्षण संचालकांनी हे प्रवेश घेण्यासाठी सोमवारी ८ मे पर्यंत मुदत दिली होती.


मात्र त्यानंतरही हजारो जागांवरील प्रवेश अद्यापही होऊ शकले नसल्याने पुन्हा एकदा १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर वेटिंग लिस्टमधील मुलांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली जाईल.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये