जिल्ह्यात केवळ ३५ टक्के पाणीसाठा!

पालघर (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात दोन मोठे, चार मध्यम आणि सहा लघु पाटबंधारे प्रकल्प असून, त्यामध्ये मिळून ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील ६० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध असल्यामुळे वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याची वेळ प्राधिकरण आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांवर आली आहे.



पालघर, डहाणू, वसई या तालुक्यांतील सिंचनासाठी, नागरी भागात पुरवण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्राला पुरविण्यात येणाऱ्या सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाच्या २७६.३५ दघमी उपयुक्त साठ्यापैकी ९४.३०९ दघमी म्हणजे ३४.१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी ९८.७६५ म्हणजेच ३५.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तर कवडास बंधाऱ्यातून ९.९६ दघमी उपयुक्त साठ्यापैकी ८.३६० दघमी म्हणजेच ८३.९४ टक्के पाणीसाठा असून, मागील वर्षी ९.८१० दघमी म्हणजेच ९८.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या

ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा)

वरवाडा पुलाचा खेळखंडोबा!

पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवला तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली

प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयार विरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी

मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही

सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पालघर :सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील