जिल्ह्यात केवळ ३५ टक्के पाणीसाठा!

पालघर (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात दोन मोठे, चार मध्यम आणि सहा लघु पाटबंधारे प्रकल्प असून, त्यामध्ये मिळून ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील ६० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध असल्यामुळे वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याची वेळ प्राधिकरण आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांवर आली आहे.



पालघर, डहाणू, वसई या तालुक्यांतील सिंचनासाठी, नागरी भागात पुरवण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्राला पुरविण्यात येणाऱ्या सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाच्या २७६.३५ दघमी उपयुक्त साठ्यापैकी ९४.३०९ दघमी म्हणजे ३४.१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी ९८.७६५ म्हणजेच ३५.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तर कवडास बंधाऱ्यातून ९.९६ दघमी उपयुक्त साठ्यापैकी ८.३६० दघमी म्हणजेच ८३.९४ टक्के पाणीसाठा असून, मागील वर्षी ९.८१० दघमी म्हणजेच ९८.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

Comments
Add Comment

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या

अर्थसंकल्पातून पालघरसाठी विकासाची ‘महा-भेट’ : खासदार डॉ. सवरा

पालघर : केंद्रीय अर्थसंकल्पात पालघर जिल्ह्यासाठी विकासाचे नवीन दरवाजे उघडले आहेत. या बजेटमध्ये पालघरच्या

कोट्यवधींचा शिक्षण कर वसूल; शाळा हस्तांतरण मात्र रखडलेलेच

महापालिकेत शिक्षण समिती व सभापती नसण्याची परंपरा कायम राहणार गणेश पाटील विरार : महापालिकेची स्थापना होऊन १६

मुंबई-बडोदरा आणि भिवंडी-मनोर मार्गांचे काम युद्धपातळीवर

रस्त्यांच्या जाळ्यांमुळे विकासाची कोंडी फुटणार वसंत भोईर वाडा : गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेचा सामना

महापौरांना ७५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता

उपमहापौरांना ६५ हजार, तर विरोधी पक्षनेत्याला ५० हजार विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना

वसई-विरार महापालिकेत महापौर पदासाठी ७ अर्ज

उपमहापौर पदासाठी ५ अर्ज विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल