गुजरात-चेन्नईचा प्लेऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित

मुंबई (प्रतिनिधी) : ‘आयपीएल’चा संग्राम आता उत्तरार्धाकडे झुकला आहे. प्रत्येक सामना रंगतदार होत आहे. दहाही संघांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे व प्रत्येक संघ प्लेऑफची तयारीही करत आहे. मात्र हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात आणि महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई यांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. गुजरात संघाची प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता ९१ टक्के आहे.तर चेन्नईची शक्यता ७८ टक्के आहे.



तर कोलकाता, दिल्ली आणि हैदराबाद या तीन संघांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता सर्वात कमी आहे. दिल्लीची शक्यता ११ टक्के इतकी आहे. तर हैदराबादची शक्यता फक्त चार टक्के आहे. कोलकाता प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता १२ टक्के इतकी आहे. दिल्लीकडून पराभूत झाल्यानंतर आरसीबीची प्लेऑफमध्ये पोहचणे खडतर झाले आहे. आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता फक्त ३४ टक्के इतकी आहे. तर मुंबईची शक्यता ३६ टक्के आहे.



सध्या प्लेऑफच्या शर्यतीत गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे आघाडीवर आहेत. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या गुणतालिकेत टॉप-४ मध्ये गुजरात टायटन्स संघासह चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांचा समावेश आहे. इतर संघांची परिस्थिती पाहिली तर राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे संघ अनुक्रमे चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. मात्र, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स संघाकडे १०-१० गुण आहेत.


प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी कोणत्या संघाला किती संधी?
गुजरात : ९१ %
चेन्नई : ७८%
लखनौ : ५८%
राजस्थान : ४२%
मुंबई : ३६%
बेंगलोर : ३४%
पंजाब : ३१%
कोलकाता : १२%
दिल्ली : ११%
हैदराबाद : ४%

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण