तांबाटी गावकऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

  262

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील तांबाटीवाडी या गावातील तरुण, महिला आणि ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. युवासेना तालुका समन्वयक अमोल बलकवडे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटात प्रवेश केलेले तरुणही यावेळी स्वगृही परतले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे यांनी हीच खरी शिवसेना आहे म्हणून गावकरी खऱ्या शिवसेनेकडे आले असे म्हटले.



तांबाटी गावातील विलास बलकवडे, अल्पेश बलकवडे, सचिन बलकवडे, मंगेश बलकवडे, राजेश बलकवडे, रुपेश बलकवडे, सुयोग सावंत, सुरज सावंत, जनार्दन सावंत, चंद्रकांत सावंत, कल्पेश सावंत, उदय चव्हाण, प्रफुल्ल चव्हाण, संजय कदम, ओम कदम यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला.



यावेळी तालुका समन्वयक अमोल बलकवडे यांनी मनोगत व्यक्त करतांना आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून कर्जत मतदार संघातील पाण्याचा आणि रस्त्याचा प्रश्न सुटल्याचे सांगितले. आमदार थोरवे यांनी आतापर्यंत दिलेला शब्द पूर्ण केला. या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, उपसभापती मनोहर थोरवे, तालुका प्रमुख संदेश पाटील, युवासेना तालुका प्रमुख रोहित विचारे, वडगाव जिल्हापरीषद संपर्क प्रमुख अरुणा सावंत, उपतालुका प्रमुख संतोष मुंढे, सल्लागार चंद्रकांत फावडे, विकास मुंढे आदि मान्यवर ही उपस्थित होते.

Comments
Add Comment

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली