तांबाटी गावकऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील तांबाटीवाडी या गावातील तरुण, महिला आणि ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. युवासेना तालुका समन्वयक अमोल बलकवडे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटात प्रवेश केलेले तरुणही यावेळी स्वगृही परतले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे यांनी हीच खरी शिवसेना आहे म्हणून गावकरी खऱ्या शिवसेनेकडे आले असे म्हटले.



तांबाटी गावातील विलास बलकवडे, अल्पेश बलकवडे, सचिन बलकवडे, मंगेश बलकवडे, राजेश बलकवडे, रुपेश बलकवडे, सुयोग सावंत, सुरज सावंत, जनार्दन सावंत, चंद्रकांत सावंत, कल्पेश सावंत, उदय चव्हाण, प्रफुल्ल चव्हाण, संजय कदम, ओम कदम यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला.



यावेळी तालुका समन्वयक अमोल बलकवडे यांनी मनोगत व्यक्त करतांना आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून कर्जत मतदार संघातील पाण्याचा आणि रस्त्याचा प्रश्न सुटल्याचे सांगितले. आमदार थोरवे यांनी आतापर्यंत दिलेला शब्द पूर्ण केला. या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, उपसभापती मनोहर थोरवे, तालुका प्रमुख संदेश पाटील, युवासेना तालुका प्रमुख रोहित विचारे, वडगाव जिल्हापरीषद संपर्क प्रमुख अरुणा सावंत, उपतालुका प्रमुख संतोष मुंढे, सल्लागार चंद्रकांत फावडे, विकास मुंढे आदि मान्यवर ही उपस्थित होते.

Comments
Add Comment

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका