मुंबई (प्रतिनिधी) : कोकणात गणेशोत्सवासाठी बाप्पाच्या स्वागतासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेचे तिकीट बुकिंग १६ मेपासून सुरू करण्यात येणार आहे.
यंदा १९ सप्टेंबरला गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखरूप व्हावा, यासाठी आधीचे रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांचे तिकीट बुकिंग येत्या १६ मेपासून सुरू होणार आहे.
कोकणात खास करून गणेशोत्सवासासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक असून कोकणातील गणेशोत्सवाला होणारी चाकरमान्यांची गर्दी आणि प्रवासातील गाड्यांचे वेळापत्रक पाहता तिकीट बुकिंगच्या दृष्टीनेही बरीच लगबग दिसून येते. त्यासाठी गणेशोत्सवाला चार महिने बाकी असतानाच खास कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांसाठी मध्य रेल्वेकडून आरक्षणासाठी १६ मेपासून बुकिंग सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला तरी अजून चार महिने बाकी असले तरी प्रवासाच्या बुकिंगसाठी तरी चाकरमानी सज्ज होणार असल्याचे दिसून येणार आहेत.
रेल्वे गाड्यांच्या बुकिंगचे वेळापत्रक :-
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…