लागा गणेशोत्सवाच्या तयारीला...

मुंबई (प्रतिनिधी) : कोकणात गणेशोत्सवासाठी बाप्पाच्या स्वागतासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेचे तिकीट बुकिंग १६ मेपासून सुरू करण्यात येणार आहे.



यंदा १९ सप्टेंबरला गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखरूप व्हावा, यासाठी आधीचे रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांचे तिकीट बुकिंग येत्या १६ मेपासून सुरू होणार आहे.



कोकणात खास करून गणेशोत्सवासासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक असून कोकणातील गणेशोत्सवाला होणारी चाकरमान्यांची गर्दी आणि प्रवासातील गाड्यांचे वेळापत्रक पाहता तिकीट बुकिंगच्या दृष्टीनेही बरीच लगबग दिसून येते. त्यासाठी गणेशोत्सवाला चार महिने बाकी असतानाच खास कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांसाठी मध्य रेल्वेकडून आरक्षणासाठी १६ मेपासून बुकिंग सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला तरी अजून चार महिने बाकी असले तरी प्रवासाच्या बुकिंगसाठी तरी चाकरमानी सज्ज होणार असल्याचे दिसून येणार आहेत.


रेल्वे गाड्यांच्या बुकिंगचे वेळापत्रक :-




  • १६ मे रोजी १३ सप्टेंबरच्या गाडीचे बुकिंग

  • १७ मे रोजी १४ सप्टेंबर रोजी पाच दिवस आधीचे बुकिंग.

  • १८ मे रोजी १५ सप्टेंबर रोजी चार दिवस आधीचे बुकिंग.

  • १९ मे रोजी १६ सप्टेंबर रोजी तीन दिवस आधीचे बुकिंग.

  • २० मे रोजी १७ सप्टेंबर रोजी दोन दिवस आधीचे बुकिंग.

  • २१ मे रोजी १८ सप्टेंबर(हरितालिका तृतीया)

  • २२ मे रोजी १९ सप्टेंबर (श्रीगणेश चतुर्थी)

  • २३ मे रोजी २० सप्टेंबर (ऋषिपंचमी)

  • २४ मे रोजी २१ सप्टेंबर (गौरी आगमन)

  • २५ मे रोजी २२ सप्टेंबर २०२३ (गौरी पूजन)

  • २६ मे रोजी (गौरी विसर्जन)

Comments
Add Comment

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

मंडाळे आशियातील सर्वात मोठा आणि आधुनिक मेट्रो डेपो !

मुंबई : मुंबईच्या मेट्रो वाहतूक यंत्रणेत नवा अध्याय सुरू होत आहे. डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो लाईन २ बी साठी मंडाळे

“जो जीता वही सिकंदर” शरद पवारांच्या बिनबुडाच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार!

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र समोर

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन