लागा गणेशोत्सवाच्या तयारीला...

मुंबई (प्रतिनिधी) : कोकणात गणेशोत्सवासाठी बाप्पाच्या स्वागतासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेचे तिकीट बुकिंग १६ मेपासून सुरू करण्यात येणार आहे.



यंदा १९ सप्टेंबरला गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखरूप व्हावा, यासाठी आधीचे रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांचे तिकीट बुकिंग येत्या १६ मेपासून सुरू होणार आहे.



कोकणात खास करून गणेशोत्सवासासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक असून कोकणातील गणेशोत्सवाला होणारी चाकरमान्यांची गर्दी आणि प्रवासातील गाड्यांचे वेळापत्रक पाहता तिकीट बुकिंगच्या दृष्टीनेही बरीच लगबग दिसून येते. त्यासाठी गणेशोत्सवाला चार महिने बाकी असतानाच खास कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांसाठी मध्य रेल्वेकडून आरक्षणासाठी १६ मेपासून बुकिंग सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला तरी अजून चार महिने बाकी असले तरी प्रवासाच्या बुकिंगसाठी तरी चाकरमानी सज्ज होणार असल्याचे दिसून येणार आहेत.


रेल्वे गाड्यांच्या बुकिंगचे वेळापत्रक :-




  • १६ मे रोजी १३ सप्टेंबरच्या गाडीचे बुकिंग

  • १७ मे रोजी १४ सप्टेंबर रोजी पाच दिवस आधीचे बुकिंग.

  • १८ मे रोजी १५ सप्टेंबर रोजी चार दिवस आधीचे बुकिंग.

  • १९ मे रोजी १६ सप्टेंबर रोजी तीन दिवस आधीचे बुकिंग.

  • २० मे रोजी १७ सप्टेंबर रोजी दोन दिवस आधीचे बुकिंग.

  • २१ मे रोजी १८ सप्टेंबर(हरितालिका तृतीया)

  • २२ मे रोजी १९ सप्टेंबर (श्रीगणेश चतुर्थी)

  • २३ मे रोजी २० सप्टेंबर (ऋषिपंचमी)

  • २४ मे रोजी २१ सप्टेंबर (गौरी आगमन)

  • २५ मे रोजी २२ सप्टेंबर २०२३ (गौरी पूजन)

  • २६ मे रोजी (गौरी विसर्जन)

Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास