लागा गणेशोत्सवाच्या तयारीला...

मुंबई (प्रतिनिधी) : कोकणात गणेशोत्सवासाठी बाप्पाच्या स्वागतासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेचे तिकीट बुकिंग १६ मेपासून सुरू करण्यात येणार आहे.



यंदा १९ सप्टेंबरला गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखरूप व्हावा, यासाठी आधीचे रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांचे तिकीट बुकिंग येत्या १६ मेपासून सुरू होणार आहे.



कोकणात खास करून गणेशोत्सवासासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक असून कोकणातील गणेशोत्सवाला होणारी चाकरमान्यांची गर्दी आणि प्रवासातील गाड्यांचे वेळापत्रक पाहता तिकीट बुकिंगच्या दृष्टीनेही बरीच लगबग दिसून येते. त्यासाठी गणेशोत्सवाला चार महिने बाकी असतानाच खास कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांसाठी मध्य रेल्वेकडून आरक्षणासाठी १६ मेपासून बुकिंग सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला तरी अजून चार महिने बाकी असले तरी प्रवासाच्या बुकिंगसाठी तरी चाकरमानी सज्ज होणार असल्याचे दिसून येणार आहेत.


रेल्वे गाड्यांच्या बुकिंगचे वेळापत्रक :-




  • १६ मे रोजी १३ सप्टेंबरच्या गाडीचे बुकिंग

  • १७ मे रोजी १४ सप्टेंबर रोजी पाच दिवस आधीचे बुकिंग.

  • १८ मे रोजी १५ सप्टेंबर रोजी चार दिवस आधीचे बुकिंग.

  • १९ मे रोजी १६ सप्टेंबर रोजी तीन दिवस आधीचे बुकिंग.

  • २० मे रोजी १७ सप्टेंबर रोजी दोन दिवस आधीचे बुकिंग.

  • २१ मे रोजी १८ सप्टेंबर(हरितालिका तृतीया)

  • २२ मे रोजी १९ सप्टेंबर (श्रीगणेश चतुर्थी)

  • २३ मे रोजी २० सप्टेंबर (ऋषिपंचमी)

  • २४ मे रोजी २१ सप्टेंबर (गौरी आगमन)

  • २५ मे रोजी २२ सप्टेंबर २०२३ (गौरी पूजन)

  • २६ मे रोजी (गौरी विसर्जन)

Comments
Add Comment

गर्दी कमी होणार? मुंबई लोकलमध्ये एसी ट्रेन वाढणार ; लवकरच धावणार १५ डब्ब्यांची लोकल

मुंबई : मुंबई लोकलमधील प्रचंड गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मोठी आणि

प्रशासनात खांदेपालट, ४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी प्रशासनात खांदेपालट करत चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. विविध

मुंबईकरांसाठी सुवर्णसंधी म्हाडाकडून मुंबईत १२० घरांची विक्री; या तारखेपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया होणार सुरु

मुंबई : मुंबईत घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व

राष्ट्रवादीच्या मुंबई पदाधिकाऱ्यांकडून 'दादांच्या' अस्थींचे विधीपूर्वक विसर्जन...

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थींचे

पाणीपट्टी वाढीवर शिक्कामोर्तब

मुंबई  : मुंबई महानगरपालिका निवडणूक पार पडल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून रखडलेला पाणीपट्टी वाढीचा निर्णय आता

BMC Election 2026: भाजप - शिवसेनेची स्वतंत्र गटनोंदणी होणार

मुंबई: आज म्हणजेच सोमवार २ फेब्रुवारी रोजी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुंबई