संजय राऊत काँग्रेसचे दलाल!

  140

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार प्रत्युत्तर


बेळगाव : काँग्रेसच्या सांगण्यावरून भाजपची मते कमी करण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दलाली करत बेळगावमध्ये आले. संजय राऊत यांनी काँग्रेसची दलाली सोडली तर मी इकडे येणार नाही, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.


देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, संजय राऊत यांनी काँग्रेसची दलाली सोडली तर मी इकडे येणार नाही. राऊत काँग्रेसची दलाली करण्यासाठी इकडे आले. त्यांचा मित्रपक्ष काँग्रेस आहे. तेव्हा त्यांना सांगायला हवे होते की येथे उमेदवार उभे करू नये. काँग्रेसच्या सांगण्यावरून भाजपची मते कमी करण्यासाठी संजय राऊत दलाली करत आले. शिल्लक सेनेकडे मुद्दे नसले की असे मुद्दे मांडतात. मात्र, शरद पवार यांनी त्यांचे सर्व मुद्दे नेस्तनाबूत केले आहेत, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.


संजय राऊत यांचा बेळगाव दौरा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस बेळगावमध्ये पोहोचले. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. दुसरीकडे, विरोधात प्रचार करत असल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांकडून फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्यात आले.


दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या विरोधात महाराष्ट्रातील नेत्यांनी येऊ नये असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने सगळ्या राजकीय पक्षांना केले होते, पण तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेळगाव उत्तरचे भाजप उमेदवार रवी पाटील यांच्या प्रचारासाठी आल्याने संतप्त झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले. फडणवीस यांच्या धिक्काराच्या घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या. पोलिसांनी लगेच धाव घेत समिती कार्यकर्त्यांना सभेच्या ठिकाणाकडे जाण्यापासून रोखले. पोलिसांनी समिती कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.


फडणवीस म्हणाले की, भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रीय पक्ष आहे. यापूर्वीही लोकसभेच्या निवडणुकीसाठी मी बेळगावात आलो आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख देखील मुख्यमंत्री असताना कर्नाटकात ते सगळीकडे फिरत होते. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी येथे आलो आहे. मराठी भाषकांच्या मागे मी आणि भारतीय जनता पार्टी देखील आहे. म्हणूनच भाजपने मराठी बोर्ड येथे तयार केला.

Comments
Add Comment

दापोलीत मुसळधार पाऊस, मुरुडमध्ये पाणी भरलं, 20 ते 25 घरांचा संपर्क तुटला, खेड दापोली रस्ता बंद

दापोली शहरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पाणी साचण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील नाले

नांदेड जिल्ह्यात रावणगावचे ग्रामस्थ गाढ झोपेत असताना आभाळ फाटलं

नांदेड : मराठवाड्याच्या काही भागांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष देणार: मंत्री नितेश राणे

चंदगड: सध्या काजूला असलेला कमी भाव ही चिंतेची बाब असून हा भाव कसा वाढेल आणि शेतकऱ्यांना चांगला दर कसा मिळेल, याकडे

कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे आणि याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र (प्रामुख्याने

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,

मुसळधार पावसाचा खेड, दापोली, चिपळूणला फटका

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय