आ. राजन साळवी यांनी आपली पात्रता ओळखूनच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर बोलावे

लांजा (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कोकणचे भाग्यविधाते आहेत. अशा परिस्थितीत ज्यांना एक नगरपंचायत सांभाळता येत नाही, त्यांनी ना. नारायण राणे यांच्यासारख्या मोठ्या नेतृत्वावर बोलू नये. किंबहुना आपली पात्रता ओळखूनच राणे यांच्यावर बोलावे, असा टोला भाजपचे लांजा तालुका अध्यक्ष महेश ऊर्फ मुन्ना खामकर यांनी लगावला आहे.



मदार राजन साळवी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपा तालुकाध्यक्ष महेश खामकर म्हणाले की, आमदार राजन साळवी हे कर्तव्यशून्य आमदार आहेत. आपल्या १४ वर्षांच्या आमदारकीच्या काळात त्यांनी तालुक्याचा काय विकास साधला? तालुक्यातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पाखाड्या नकोत, तर हॉस्पिटल पाहिजेत. मुलांच्या शिक्षणासाठी कॉलेज पाहिजेत. एमआयडीसी पाहिजे. जेणेकरून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळेल. मात्र यासाठी आपण किती प्रयत्न केलेत आणि काय विकास साधला, हे एकदा सांगावे.



ज्या नगरपंचायतीवर आपली सत्ता होती ती नगरपंचायत आपल्याला सांभाळता आली नाही, अशांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर बोलणे म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कोकणचे भाग्यविधाते नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बोलून पक्षाध्यक्ष उद्धव यांची शाबासकी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न आ. राजन साळवी हे करत आहेत, अशी टीका महेश खामकर यांनी केली.



एका बाजूला बारसू येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला समर्थन द्यायचे आणि दुसरीकडे आपल्याच पक्षातील स्थान टिकून राहावे. यासाठी पत्रकार परिषदा घेऊन उद्धव ठाकरे यांना खूष करण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करायचा हेच त्यांचे उद्योग आहेत.



बारसू हा प्रकल्प कोकणवासीयांसाठी फायद्याचा असणार आहे. येथील तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. असे असताना या चांगल्या प्रकल्पाला एकीकडे विरोध करायचा आणि समर्थनही द्यायचे, ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे. तालुक्यात एकही आमसभा न घेणारा आमदार अशी आ. साळवींची ख्याती आहे. म्हणूनच यापुढे आ. राजन साळवी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर बोलू नये अन्यथा तुम्हाला जशास तसे उत्तर दिले जाईल. राणे यांच्याविरोधात काहीबाही बरळून पक्षप्रमुखांची शाबासकी मिळवण्याच्या नादात तुम्हाला हे प्रकरण अंगलट येईल. ते तुम्हाला महागात पडेल, असा इशारादेखील महेश खामकर यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात