बारसू रिफायनरी समर्थनार्थ राजापुरात आज भव्य मोर्चा

  168

मोठ्या संख्येने समर्थक होणार सामील


राजापूर (प्रतिनिधी) : ‘भावी पिढीच्या भविष्यासाठी आणि कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी बारसू येथे प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे’ या मागणीसाठी व या प्रकल्पाला असलेल्या समर्थनाची ताकद दाखविण्यासाठी शनिवारी ६ मे रोजी राजापुरात भव्य रिफायनरी समर्थन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता बंदरधक्का येथे एकत्र जमून तेथून या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. जवाहर चौकात येऊन समर्थकांची शक्ती व संघटन दाखवतानाच रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, असा नारा देण्यात येणार आहे.



राजापूर शहरातील बंदर धक्का येथून या समर्थन मोर्चाला प्रारंभ होणार असून तो जवाहर चौकात येणार आहे. तेथे या समर्थन मोर्चाला उपस्थित सर्व मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या समर्थन मोर्चाला केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांसह सर्वपक्षीय समर्थक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप तालुका अध्यक्ष अभिजीत गुरव, शिवसेना तालुका प्रमुख अशफाक हाजू व रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समितीचे नेते हनिफ मुसा काझी यांनी दिली आहे. यासाठी प्रशासनाकडून योग्य ती परवानगी घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.



राजापूर तालुक्यात बारसू परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला दिवसेंदिवस समर्थन वाढत आहे. मात्र तरीही बाहेरून येणारी काही मंडळी प्रकल्पाच्या विरोधात नारा देत स्थानिकांना चुकीची माहिती देऊन भडकविण्याचा व वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत, तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री असताना प्रकल्पासाठी बारसूच्या जागेचे पत्र पंतप्रधानांना दिलेले असतानाही आता तेच या प्रकल्पाला विरोध करत असून ६ मे रोजी त्यांनी प्रकल्प स्थळी येण्याची घोषणा केली आहे. याच समर्थकांनी आता एकत्रित येऊन समर्थकांची ताकद दाखविण्यासाठी समर्थकांकडून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.



रिफायनरीसाठी ड्रिलचे काम सुरळीत सुरू


आंदोलकांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून ठिकठिकाणी जमाव करून ड्रिलच्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस प्रशासनाने तत्काळ आवश्यक ती कार्यवाही करून आंदोलकांना ड्रिलचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचू दिले नाही व आंदोलकांची पांगापांग केली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बारसू येथील परिस्थितीवर व्यवस्थित नियंत्रण ठेवले असून ड्रिलचे कामही सुरळीत सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. या आंदोलनात सहभागी ग्रामस्थ अमोल बोळे व इतरांनी आम्हाला शेतीविषयक कामे करण्यासाठी व घरी जाण्यास प्रशासन १४४ कलमानुसार रोखत असून हे आदेश तत्काळ मागे घ्यावेत, अशी याचिका मुंबई हायकोर्ट येथे दाखल करण्यात आली होती. त्या अानुषंगाने न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेश मागे घेण्याच्या निर्णयास २४ तास पूर्ण होण्यापूर्वीच अमोल बोळे, कमलाकर गुरव व इतरांनी आंदोलनात सहभाग घेतल्याने अमोल बोळे व कमलाकर गुरव यांना अटक करण्यात आली आहे. या सर्व घटनांनंतर पोलिसांनी परिस्थितीवर व्यवस्थित नियंत्रण ठेवले असून ड्रिलचे कामही सुरळीत सुरु आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.



बंदरधक्का येथे सकाळी ११ वाजता एकत्र जमून तेथून या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. जवाहर चौकात येऊन समर्थकांची शक्ती व संघटन दाखवतानाच रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, असा नारा देण्यात येणार आहे. या समर्थन मोर्चाला राजापूर शहरसह ग्रामीण भागातील सर्व समर्थक, विविध सामाजिक संघटना व त्यांचे पदाधिकारी, विविध वाहतूक संघटना, व्यापारी संघटना, आंबा बागायतदार असे हजारो लोक उपस्थित राहणार आहेत. अत्यंत शांततापूर्ण वातावरणात हा मोर्चा काढला जाणार आहे. ‘आमचा कोणालाही विरोध नाही तर कशाप्रकारे हा प्रकल्प तालुका, जिल्हा, राज्य आणि देशाच्या विकासात महत्त्वाचा ठरू शकतो हे सांगतानाच समर्थनाची शक्ती किती मोठी आहे हे दाखवून देण्यासाठी हा समर्थन हा मोर्चा आहे’, असे निलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शनिवारी समर्थकांची शक्ती दिसून येईल, असेही गुरव, हाजू व काझी यांनी सांगितले. प्रशासनाकडे अशाप्रकारे समर्थन मोर्चासाठी आम्ही योग्य व कायदेशीर परवानगी मागितलेली आहे. त्यामुळे शांततेत मोर्चा काढून आमच्या समर्थनाची ताकद दाखवणारच, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण