अवकाळीमुळे ‘हापूस’वर अवकळा

नवी मुंबई (वार्ताहर) : कोकणात यावर्षी हापूस आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून गेल्या सहा वर्षांत यंदाचे वर्ष हे सर्वांत कमी उत्पादनाचे ठरले आहे. हवामान बदल, तापमानात कमालीची वाढ, अवकाळी अतिवृष्टी, ढगाळ वातावरण यामुळे यावर्षी कोकणात दोन ते तीन वेळा मोहोर गळून गेला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळधारण न होणे, मोहोर संवर्धानात अडथळा आणि वातावरणात झालेल्या बदलांमुळे कीडरोगाचा प्रादुर्भाव झाल्याने या सर्वांचा परिणाम आंब्याचे विशेषत: हापूस आंब्याचे उत्पादन घटण्यावर झाला आहे. परिणामी, आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने या शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राज्य आंबा उत्पादक संघाने केली आहे.



हापूसचा प्रवास हा मार्च, एप्रिलमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी असा सुरू होतो. तर महाड, म्हसळे, श्रीवर्धन, माणंगाव या तालुक्यांच्या तुलनेने यंदा अधिक प्रमाणात रोहा, मुरुड व अलिबाग तालुक्यात आंब्याचे उत्पादन जास्त आहे. पाली, सुधागड, पेण, कर्जत, खालापूर या तालुक्यांतही मागील काही वर्षांपासून हापूस लागवडीकडे शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत
केले आहे.



सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याप्रमाणेच रायगड जिल्ह्यात समुद्रातील खाऱ्या हवामानामुळे श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग तालुक्यांत हवामान पोषक आहे. मात्र हेच तालुके यावेळी निसर्ग चक्रीवादळाचे केंद्रबिंदू होते. त्यामुळे हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात फळे देणारी मोठमोठी झाडे तीन वर्षांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने धारातिर्थी पडली. तर, अनेक झाडे कमकुवत झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. झाडे कमी आणि झाडांवर आंबे कमी असे चित्र आहे.



या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला मिळालेले अल्प उत्पादन विक्रीयोग्य करण्यासाठी प्रचंड खर्च आला आहे आणि प्रत्यक्षात हाती येणारा नफा हा अत्यल्प आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी राज्य फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे केली आहे.


शिल्लक आंबा वाचवण्याची धडपड...
चांगल्या प्रतीचा आंबा मॉल किंवा ऑनलाइन कृषी माल पुरवणाऱ्या कंपन्यांकडे जातो. तर, १० ते १५ टक्के आंबा निर्यातीसाठी जातो. अर्ध्याहून अधिक आंबा हा एपीएमसीमध्ये घाऊक विक्रीसाठी जातो. यावर्षी मात्र सगळीकडे शांतता आहे. हापूस उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांच्या बागांमध्येच आंबाच नाही. तशातच अवकाळीची टांगती तलवार डोक्यावर आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांना शिल्लक आंबा वाचविण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत.

Comments
Add Comment

या वर्षीही हापूसची चव उशिराच; आंबा बागायतदार चिंतेत !

लांबलेल्या पावसाचा कोकणातील आंबा उत्पादनावर परिणाम रत्नागिरी (वार्ताहर) : यंदा पावसाने मुक्काम वाढविला आहे. या

माणगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका

माणगाव-इंदापूर बायपासचे काम सुरू माणगाव (वार्ताहर): मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे. या रखडलेल्या

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या