अवकाळीमुळे ‘हापूस’वर अवकळा

  123

नवी मुंबई (वार्ताहर) : कोकणात यावर्षी हापूस आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून गेल्या सहा वर्षांत यंदाचे वर्ष हे सर्वांत कमी उत्पादनाचे ठरले आहे. हवामान बदल, तापमानात कमालीची वाढ, अवकाळी अतिवृष्टी, ढगाळ वातावरण यामुळे यावर्षी कोकणात दोन ते तीन वेळा मोहोर गळून गेला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळधारण न होणे, मोहोर संवर्धानात अडथळा आणि वातावरणात झालेल्या बदलांमुळे कीडरोगाचा प्रादुर्भाव झाल्याने या सर्वांचा परिणाम आंब्याचे विशेषत: हापूस आंब्याचे उत्पादन घटण्यावर झाला आहे. परिणामी, आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने या शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राज्य आंबा उत्पादक संघाने केली आहे.



हापूसचा प्रवास हा मार्च, एप्रिलमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी असा सुरू होतो. तर महाड, म्हसळे, श्रीवर्धन, माणंगाव या तालुक्यांच्या तुलनेने यंदा अधिक प्रमाणात रोहा, मुरुड व अलिबाग तालुक्यात आंब्याचे उत्पादन जास्त आहे. पाली, सुधागड, पेण, कर्जत, खालापूर या तालुक्यांतही मागील काही वर्षांपासून हापूस लागवडीकडे शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत
केले आहे.



सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याप्रमाणेच रायगड जिल्ह्यात समुद्रातील खाऱ्या हवामानामुळे श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग तालुक्यांत हवामान पोषक आहे. मात्र हेच तालुके यावेळी निसर्ग चक्रीवादळाचे केंद्रबिंदू होते. त्यामुळे हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात फळे देणारी मोठमोठी झाडे तीन वर्षांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने धारातिर्थी पडली. तर, अनेक झाडे कमकुवत झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. झाडे कमी आणि झाडांवर आंबे कमी असे चित्र आहे.



या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला मिळालेले अल्प उत्पादन विक्रीयोग्य करण्यासाठी प्रचंड खर्च आला आहे आणि प्रत्यक्षात हाती येणारा नफा हा अत्यल्प आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी राज्य फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे केली आहे.


शिल्लक आंबा वाचवण्याची धडपड...
चांगल्या प्रतीचा आंबा मॉल किंवा ऑनलाइन कृषी माल पुरवणाऱ्या कंपन्यांकडे जातो. तर, १० ते १५ टक्के आंबा निर्यातीसाठी जातो. अर्ध्याहून अधिक आंबा हा एपीएमसीमध्ये घाऊक विक्रीसाठी जातो. यावर्षी मात्र सगळीकडे शांतता आहे. हापूस उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांच्या बागांमध्येच आंबाच नाही. तशातच अवकाळीची टांगती तलवार डोक्यावर आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांना शिल्लक आंबा वाचविण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत.

Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी