अफवा पसरवणाऱ्यांपासून सावध रहा!

उदय सामंत यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा


रत्नागिरी: कोकणातील बारसू रिफायनरी विरोधात आज उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर असतानाच शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले, लोकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. रिफायनरी होणार की नाही हा निर्णय स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करुनच घेतला जाईल. काल महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन त्यांनाही याबाबतची कल्पना देण्यात आली आहे.


दरम्यान, उद्धव ठाकरेंकडून बारसू रिफायनरीच्या विरोधात पैसे घेऊन लोकांना भडकविले जात असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांच्याकडून वेळोवेळी केला जात आहे. सकाळी भाजपचे माजी खासदार निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली समर्थन मोर्चा काढण्यात आला. उद्धव ठाकरे यांचे पितळ केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे तसेच नितेश राणे आणि निलेश राणे यांनी वेळोवेळी उघडे पाडले आहे.

Comments
Add Comment

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय व

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.