अफवा पसरवणाऱ्यांपासून सावध रहा!

उदय सामंत यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा


रत्नागिरी: कोकणातील बारसू रिफायनरी विरोधात आज उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर असतानाच शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले, लोकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. रिफायनरी होणार की नाही हा निर्णय स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करुनच घेतला जाईल. काल महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन त्यांनाही याबाबतची कल्पना देण्यात आली आहे.


दरम्यान, उद्धव ठाकरेंकडून बारसू रिफायनरीच्या विरोधात पैसे घेऊन लोकांना भडकविले जात असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांच्याकडून वेळोवेळी केला जात आहे. सकाळी भाजपचे माजी खासदार निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली समर्थन मोर्चा काढण्यात आला. उद्धव ठाकरे यांचे पितळ केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे तसेच नितेश राणे आणि निलेश राणे यांनी वेळोवेळी उघडे पाडले आहे.

Comments
Add Comment

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या