गुहागर एसटी डेपोचा गलथान कारभार

चिपळूण (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ गुहागर एसटी डेपोचा कारभार अत्यंत गलथान असून अनेक एसटी बसेस नादुरुस्त, तरीही रस्त्यावर लांब पल्ल्याच्या फेऱ्या सोडतात. एसटी बस रस्त्यातच कायमस्वरूपी बिघाड होऊन नादुरुस्त होतात. प्रवाशांचा खोळंबा करण्यात गुहागर आगाराचा प्रथम क्रमांक लागतो. गुहागर डेपोत एकूण ६५ एसटी गाड्या आहेत. ७४ शेड्युल आहेत. उन्हाळी हंगामात लांब पल्ल्याच्या गाड्या बंद केल्या जातात.



गुहागर-कोल्हापूर दुपारी ३ वा. सुटणारी बस गेले आठवडाभर बंद आहे. १५ ते १६ गाड्या नादुरुस्त आहेत. ३ मे रोजी डेपो मॅनेजर म्हणून वनकुंद्रे यांनी प्रभारी मॅनेजर म्हणून चार्ज घेतला. ३ मे पहिल्या दिवशीच पुणे महामार्गावरील स्वारगेट-गुहागर गाडी सातारा येथे पंक्चर झाली.



गाडीचा पंक्चर सातारा डेपोत लवकर काढला जात नव्हता. प्रवाशांना तिष्ठत बसावे लागले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार व कोकण ग्रामीण विभागाचे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी सातारा डेपोचे मॅनेजर यांना भेटले. त्यांनी रत्नागिरी जिल्हा विभाग नियंत्रक अधिकारी गुहागरचे वरिष्ठ अधिकारी स्वामित शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. स्वारगेट गुहागर गाडीचे पुढचे चाक पंक्चर होते ते खोलले असता चार-पाच अनावश्यक उपयोगी नसलेल्या ट्यूब होत्या. त्यामुळे केव्हाही अपघात होऊन प्रवासांच्या जीवावर बेतले असते. तिथे कोकण प्रवासी महासंघाचे ग्रामीण विभाग महासंघाच्या अध्यक्षांनी चाक व्यवस्थित दुरुस्त करून घेतल्याने पुढील अनर्थ टळला.



पिंपळी- चिंचवड-गुहागर ही बस कोंडे येथे बंद पडली. गाडी नंबर २१४९ गाडी, नंबर २२७० या गाड्या नादुरुस्त असून बैलगाडी पुढे जाईल. पण या गाड्या जात नाहीत. उन्हाळी हंगामात गुहागर डेपोने प्रवासांना तिष्ठत ठेवू नये. गाड्या व्यवस्थित लांब पल्ल्यासाठी सोडाव्यात. पुणे मार्गावर कायम ब्रेक डाऊन गाड्या सोडल्या जातात. कोकण प्रवासी ग्रामीण विभाग महासंघाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी चांगली सुविधा देण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात