गुहागर एसटी डेपोचा गलथान कारभार

चिपळूण (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ गुहागर एसटी डेपोचा कारभार अत्यंत गलथान असून अनेक एसटी बसेस नादुरुस्त, तरीही रस्त्यावर लांब पल्ल्याच्या फेऱ्या सोडतात. एसटी बस रस्त्यातच कायमस्वरूपी बिघाड होऊन नादुरुस्त होतात. प्रवाशांचा खोळंबा करण्यात गुहागर आगाराचा प्रथम क्रमांक लागतो. गुहागर डेपोत एकूण ६५ एसटी गाड्या आहेत. ७४ शेड्युल आहेत. उन्हाळी हंगामात लांब पल्ल्याच्या गाड्या बंद केल्या जातात.



गुहागर-कोल्हापूर दुपारी ३ वा. सुटणारी बस गेले आठवडाभर बंद आहे. १५ ते १६ गाड्या नादुरुस्त आहेत. ३ मे रोजी डेपो मॅनेजर म्हणून वनकुंद्रे यांनी प्रभारी मॅनेजर म्हणून चार्ज घेतला. ३ मे पहिल्या दिवशीच पुणे महामार्गावरील स्वारगेट-गुहागर गाडी सातारा येथे पंक्चर झाली.



गाडीचा पंक्चर सातारा डेपोत लवकर काढला जात नव्हता. प्रवाशांना तिष्ठत बसावे लागले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार व कोकण ग्रामीण विभागाचे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी सातारा डेपोचे मॅनेजर यांना भेटले. त्यांनी रत्नागिरी जिल्हा विभाग नियंत्रक अधिकारी गुहागरचे वरिष्ठ अधिकारी स्वामित शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. स्वारगेट गुहागर गाडीचे पुढचे चाक पंक्चर होते ते खोलले असता चार-पाच अनावश्यक उपयोगी नसलेल्या ट्यूब होत्या. त्यामुळे केव्हाही अपघात होऊन प्रवासांच्या जीवावर बेतले असते. तिथे कोकण प्रवासी महासंघाचे ग्रामीण विभाग महासंघाच्या अध्यक्षांनी चाक व्यवस्थित दुरुस्त करून घेतल्याने पुढील अनर्थ टळला.



पिंपळी- चिंचवड-गुहागर ही बस कोंडे येथे बंद पडली. गाडी नंबर २१४९ गाडी, नंबर २२७० या गाड्या नादुरुस्त असून बैलगाडी पुढे जाईल. पण या गाड्या जात नाहीत. उन्हाळी हंगामात गुहागर डेपोने प्रवासांना तिष्ठत ठेवू नये. गाड्या व्यवस्थित लांब पल्ल्यासाठी सोडाव्यात. पुणे मार्गावर कायम ब्रेक डाऊन गाड्या सोडल्या जातात. कोकण प्रवासी ग्रामीण विभाग महासंघाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी चांगली सुविधा देण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी