शरद पवार हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कॉपी करताहेत

संजय राऊतांची टिवटिव


मुंबई : शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केल्यानंतर कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी भावूक झाले आहेत. ते पवारसाहेबांना निर्णय मागे घेण्यासाठी विनवणी करत असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टिवटिव करत आपले ज्ञान पाजळले आहे.


संजय राऊत यांनी, एक वेळ अशी आली.. घाणेरडे आरोप.. प्रत्यारोप.. राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी तेच केले आहे. जनतेच्या रेट्यामुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत, असे ट्विट केले आहे.




संजय राऊत यांनी आणखी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, भाकरी फिरवण्याचे संकेत होते.. पण तवाच फिरवला.. शरद पवार काही दिवसांपूर्वी एका भाषणात म्हणाले होते की, भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. त्यावरून संजय राऊत यांनी ही जखमेवर मीठ चोळणारी प्रतिक्रिया दिली आहे.

Comments
Add Comment

Nagpur News : नागपुरात IPL सट्टेबाजीचा मोठा पर्दाफाश; ४० लाखांची रोकड जप्त, 'दुबई कनेक्शन'ने पोलीस चक्रावले!

नागपूर : आयपीएलच्या (IPL) रणधुमाळीत नागपूर शहरात सट्टेबाजीचे जाळे वेगाने पसरल्याचे समोर आले आहे. प्रतापनगर

Dhule News : रक्तदाब घटला, झटके आले अन्... धुळ्यातील अविवाहित तरुणीचं गर्भपात प्रकरण उघड

धुळे : धुळे शहरालगतच्या एका गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्नाआधीच गरोदर राहिलेल्या एका १८ वर्षीय

Nashik Crime IT Company : हाऊसकिपींगच्या वेशात नाशिकच्या महिला पोलिसांनी केला आयटी कंपनीचा पर्दाफाश; उलघडले अनेक खुलासे

नाशिक : महिलांवर अत्याचार करणाऱ्या महिलांना फसवणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात हे प्रकरण सुरु असतानाच नाशिकच्या

Ashok Kharat Case : अशोक खरातला पुन्हा ५ दिवसांची पोलिस कोठडी

नाशिक : भोंदूगिरी व महिलांच्या शोषणाच्या आरोपांमध्ये अडकलेल्या अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढल्या असून,

Accident News : मध्यधुंद कारचालक आणि तीन जीवांचा निष्पाप बळी; कुटुंब झालं उध्वस्त

कोल्हापूर : हातकणंगल्यात झालेल्या अपघातामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. मृत उदय अशोक जाधव (34) आणि त्यांचा पाच

Vidarbha Heat Wave : विदर्भात उष्णतेचा कहर; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

विदर्भात एप्रिल महिन्याच्या मध्यातच उष्णतेचा तडाखा (Vidarbha Heat Wave) तीव्र होऊ लागला असून नागरिकांना पुढील काही दिवस