Accident News : मध्यधुंद कारचालक आणि तीन जीवांचा निष्पाप बळी; कुटुंब झालं उध्वस्त

कोल्हापूर : हातकणंगल्यात झालेल्या अपघातामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. मृत उदय अशोक जाधव (34) आणि त्यांचा पाच वर्षाचा मुलगा धैर्यशील यांच्यावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आल्याने गावावर शोककळा पसरली आहे.



नेमका अपघात घडला कसा?


रविवारी संध्याकाळी हातकणंगले तालुक्यातील तळसंदे - वाठार रस्त्यावर तिहेरी अपघात झाला. बाप आणि लेकाचा जागीच मृत्यु झाला तर आई आणि लहान मुलगी गंभीर जखमी आहे. रविवारी संध्याकाळी हे कुटुंब यात्रेला दुचाकीवरून केकले याठिकाणी जत्रेसाठी जात होते. तेव्हा काळाने झडप घातली. तळसंदे- वाठार रस्त्यावर भरधाव कारने सलग तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. यामध्ये चिमुकल्या धैर्यशीलच जागीच मृत्यू झाला. तर आई आणि मुलगी गंभीर असून कोल्हापुरात उपचार सुरु आहेत.



उदय जाधव यांच्यावर कुटुंबाचा भार होता, आई वडील, पत्नी आणि दोन मुलांसह ते अंबप येथे राहत होते, शिरोली एमआयडीसीत नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आपला एकुलता एक मुलाचं असं अपघाती निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.



कारचालकाने अनेक वाहनांना उडवले


तळसंदे गावच्या वळणावर या गाडीने एक दुचाकीला धडक दिली त्यानंतर वाठारच्या दिशेने वेगाने जाताना वारणा बाजार येथील पेट्रोल पंपासमोर पुन्हा एका चारचाकी सुमोला धडक दिली शिवाय एका दुचाकीला उडवले. यात अनेक जण जखमी झाले आहे. मध्यधुंद चारचाकी चालक सदशिव चिकान्नवरमठ याला लवकरात लवकर पकडून अटक करा अशी मागणी पोलिसांकडे जोर धरत आहे.

Comments
Add Comment

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Dog Attack : रेबीजमुळे चिमुकल्या समर्थ स्वामीचा दुर्दैवी मृत्यू; भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी

सोलापूर : भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या समर्थ स्वामी या

Amravati News : धक्कादायक! आश्रमशाळेतील ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जेवणानंतर उलट्या, पोटदुखीने उडाली खळबळ

अमरावती : अमरावतीच्या मेळघाट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धारणी तालुक्यातील टीटंबा येथील शासकीय

Mumbai-Pune Water Update : मुंबई-पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! धरणांत मुबलक जलसाठा; पाहा कोणत्या तलावात किती टक्के पाणी ?

मुंबई : यंदाच्या मान्सूनने सुरुवातीला हुलकावणी दिली असली, तरी जुलै महिन्यात मुंबई (Mumbai) आणि पुण्याच्या पाणलोट

Ashadhi Ekadashi 2026 : विठ्ठलाच्या मूर्तीवरील प्रत्येक खूण सांगते एक कथा! जाणून घ्या दडलेले आध्यात्मिक अर्थ

विठ्ठलाच्या (Vitthal) मूर्तीवरील प्रत्येक खूण का आहे खास? https://prahaar.in/2026/07/25/pune-metro-news-hinjawadi-shivajinagar-pune-metro-li

Pune Metro : IT कर्मचाऱ्यांची ट्रॅफिकमधून सुटका! हिंजवडी मेट्रोला अखेर 'ग्रीन सिग्नल'; माण ते बालेवाडी प्रवासी सेवेचा मार्ग मोकळा

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीची डोकेदुखी ठरलेल्या हिंजवडी IT पार्कच्या प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक आणि मोठी