पाकव्याप्त काश्मीर परत घेणे भारताचे लक्ष्य - जितेंद्र सिंह

लंडन : पाकव्याप्त काश्मीर परत मिळवणे हे भारत सरकारच्या मुख्य अजेंड्यापैकी एक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी केले. जितेंद्र सिंह सध्या इग्लंडच्या यात्रेवर आहेत. प्रवासादरम्यान सामाजिक गट आणि जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.


याप्रसंगी जितेंद्र सिंह म्हणाले की, जर तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांना उर्वरित भारता प्रमाणे जम्मू-काश्मीर हाताळण्याची मुभा मिळाली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. पीओकेचा मुद्दा कधीच पुढे आला नसता. पीओके पाकिस्तानच्या नियंत्रणातून परत आणणे हा केंद्र सरकारचा मुख्य अजेंडा आहे. यादरम्यान जितेंद्र सिंह यांनी ‘भारतविरोधी वक्तव्य’ बदलल्याबद्दल येथे उपस्थित लोकांचे आभार मानले आहेत.


जितेंद्र सिंह हे जम्मू-काश्मीरच्या उधमपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. चर्चेदरम्यान जुन्या सरकारने केलेल्या अनेक विसंगतींवर जितेंद्र सिंह यांनी विरोधकांवर निशाणा साधला. राज्यातील कलम ३७० लागू झाल्यानंतरच जम्मू-काश्मीरच्या लोकांना आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरच्या दोन मुलींना त्यांचे नागरिकत्व आणि मालमत्तेचे घटनात्मक अधिकार दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे नेहमीच स्मरण केले जाईल. तसेच पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांनाही त्यांचे हक्क मिळणार आहेत. सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान, सामाजिक गटांनी अधोरेखित केले आहे की ते भारतासोबत असलेल्या लोकांना एकत्र करत आहेत. भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या लोकांविरोधात ही संघटना स्थापन केली जात आहे.

Comments
Add Comment

भारतीय उद्योगांसाठी युरोपीयन बाजारपेठ

९० टक्के वस्तूंवर शुल्क माफ करारामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना बळ नवी दिल्ली : भारत आणि युरोपीयन

भारताला नुकसान पोहोचवणे, हाच पाकिस्तानचा अजेंडा

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘पाकिस्तानने नेहमीच विनाकारण

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

१ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर

‘मदर ऑफ ऑल डील’वर स्वाक्षरी

भारत व युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची अधिकृत घोषणा नवी दिल्ली : भारत आणि युरोपियन युनियनमध्ये

Jammu And Kashmir : जम्मू-श्रीनगर महामार्गावर बस आणि ट्रकची भीषण धडक; CRPF जवानांसह चौघांचा मृत्यू, अनेक जखमी

जम्मू-काश्मीर : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी काळाने भीषण घाला घातला. उधमपूर जिल्ह्यात एक

जम्मू काश्मीर : बर्फवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावरील सर्व विमानसेवा रद्द

श्रीनगर विमानतळावरील येणारी - जाणारी सर्व उड्डाणे सततच्या बर्फवृष्टीमुळे आणि खराब हवामानामुळे रद्द करण्यात