पाकव्याप्त काश्मीर परत घेणे भारताचे लक्ष्य - जितेंद्र सिंह

  357

लंडन : पाकव्याप्त काश्मीर परत मिळवणे हे भारत सरकारच्या मुख्य अजेंड्यापैकी एक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी केले. जितेंद्र सिंह सध्या इग्लंडच्या यात्रेवर आहेत. प्रवासादरम्यान सामाजिक गट आणि जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.


याप्रसंगी जितेंद्र सिंह म्हणाले की, जर तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांना उर्वरित भारता प्रमाणे जम्मू-काश्मीर हाताळण्याची मुभा मिळाली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. पीओकेचा मुद्दा कधीच पुढे आला नसता. पीओके पाकिस्तानच्या नियंत्रणातून परत आणणे हा केंद्र सरकारचा मुख्य अजेंडा आहे. यादरम्यान जितेंद्र सिंह यांनी ‘भारतविरोधी वक्तव्य’ बदलल्याबद्दल येथे उपस्थित लोकांचे आभार मानले आहेत.


जितेंद्र सिंह हे जम्मू-काश्मीरच्या उधमपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. चर्चेदरम्यान जुन्या सरकारने केलेल्या अनेक विसंगतींवर जितेंद्र सिंह यांनी विरोधकांवर निशाणा साधला. राज्यातील कलम ३७० लागू झाल्यानंतरच जम्मू-काश्मीरच्या लोकांना आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरच्या दोन मुलींना त्यांचे नागरिकत्व आणि मालमत्तेचे घटनात्मक अधिकार दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे नेहमीच स्मरण केले जाईल. तसेच पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांनाही त्यांचे हक्क मिळणार आहेत. सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान, सामाजिक गटांनी अधोरेखित केले आहे की ते भारतासोबत असलेल्या लोकांना एकत्र करत आहेत. भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या लोकांविरोधात ही संघटना स्थापन केली जात आहे.

Comments
Add Comment

Terrorist hideout destroyed: पुंछमध्ये दहशतवादी अड्डा नष्ट, शस्त्रसामुग्री जप्त

सुरनकोट जंगलात लष्कर-पोलिसांच्या संयुक्त कारवाईत शस्त्रसाठा सापडला; किश्तवाडमध्ये स्वतंत्र दहशतवादविरोधी

Bihar polls: सॅनिटरी पॅडवर राहुल गांधींचा फोटो; 'हा महिलांचा अपमान' महिलांची टीका

पाटणा : बिहार काँग्रेसने "प्रियदर्शिनी उड्डाण योजना" अंतर्गत पाच लाख सॅनिटरी पॅड बॉक्स वाटप करण्याची घोषणा केली

शाळेच्या गेटवर विद्यार्थ्याचा वडिलांच्या मांडीवर मृत्यू

बाराबंकी : शाळेच्या गेटवर विद्यार्थ्याचा वडिलांच्या मांडीवर मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशमधील

PM Modi Award List : ११ वर्षांत २५ पुरस्कार, आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदींचा सन्मान; पाहा पुरस्कारांची संपूर्ण यादी…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घाना या देशाने त्यांचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. मोदी

अमरनाथ यात्रा मार्गावर भीषण अपघात: ५ बस एकमेकांवर आदळल्या, ३६ यात्रेकरू जखमी!

जम्मू: अमरनाथ यात्रेला निघालेल्या भाविकांवर आज दुर्दैवी प्रसंग ओढवला. जम्मू आणि काश्मीरमधील रामबन

Grand Chess Tour 2025 : गुकेशची कमाल! कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं अन् गुकेशनं त्याच्याचं नाकावर टिच्चून 'रॅपिड' स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं

नवी दिल्ली : क्रोएशियातील झाग्रेब येथे झालेल्या ग्रँड चेस टूर २०२५ रॅपिड अँड ब्लिट्झमध्ये विद्यमान विश्वविजेता