पाकव्याप्त काश्मीर परत घेणे भारताचे लक्ष्य - जितेंद्र सिंह

लंडन : पाकव्याप्त काश्मीर परत मिळवणे हे भारत सरकारच्या मुख्य अजेंड्यापैकी एक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी केले. जितेंद्र सिंह सध्या इग्लंडच्या यात्रेवर आहेत. प्रवासादरम्यान सामाजिक गट आणि जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.


याप्रसंगी जितेंद्र सिंह म्हणाले की, जर तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांना उर्वरित भारता प्रमाणे जम्मू-काश्मीर हाताळण्याची मुभा मिळाली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. पीओकेचा मुद्दा कधीच पुढे आला नसता. पीओके पाकिस्तानच्या नियंत्रणातून परत आणणे हा केंद्र सरकारचा मुख्य अजेंडा आहे. यादरम्यान जितेंद्र सिंह यांनी ‘भारतविरोधी वक्तव्य’ बदलल्याबद्दल येथे उपस्थित लोकांचे आभार मानले आहेत.


जितेंद्र सिंह हे जम्मू-काश्मीरच्या उधमपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. चर्चेदरम्यान जुन्या सरकारने केलेल्या अनेक विसंगतींवर जितेंद्र सिंह यांनी विरोधकांवर निशाणा साधला. राज्यातील कलम ३७० लागू झाल्यानंतरच जम्मू-काश्मीरच्या लोकांना आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरच्या दोन मुलींना त्यांचे नागरिकत्व आणि मालमत्तेचे घटनात्मक अधिकार दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे नेहमीच स्मरण केले जाईल. तसेच पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांनाही त्यांचे हक्क मिळणार आहेत. सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान, सामाजिक गटांनी अधोरेखित केले आहे की ते भारतासोबत असलेल्या लोकांना एकत्र करत आहेत. भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या लोकांविरोधात ही संघटना स्थापन केली जात आहे.

Comments
Add Comment

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या

ESMA Act : इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'एस्मा' कायदा लागू

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धामुळे जगातील इंधन टंचाईवर मोठा

गॅस पुरवठ्याबाबत केंद्राचा ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली: पश्चिम आशियामध्ये इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता टोकाला पोहोचला असून, त्याचे पडसाद