पाकव्याप्त काश्मीर परत घेणे भारताचे लक्ष्य - जितेंद्र सिंह

लंडन : पाकव्याप्त काश्मीर परत मिळवणे हे भारत सरकारच्या मुख्य अजेंड्यापैकी एक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी केले. जितेंद्र सिंह सध्या इग्लंडच्या यात्रेवर आहेत. प्रवासादरम्यान सामाजिक गट आणि जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.


याप्रसंगी जितेंद्र सिंह म्हणाले की, जर तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांना उर्वरित भारता प्रमाणे जम्मू-काश्मीर हाताळण्याची मुभा मिळाली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. पीओकेचा मुद्दा कधीच पुढे आला नसता. पीओके पाकिस्तानच्या नियंत्रणातून परत आणणे हा केंद्र सरकारचा मुख्य अजेंडा आहे. यादरम्यान जितेंद्र सिंह यांनी ‘भारतविरोधी वक्तव्य’ बदलल्याबद्दल येथे उपस्थित लोकांचे आभार मानले आहेत.


जितेंद्र सिंह हे जम्मू-काश्मीरच्या उधमपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. चर्चेदरम्यान जुन्या सरकारने केलेल्या अनेक विसंगतींवर जितेंद्र सिंह यांनी विरोधकांवर निशाणा साधला. राज्यातील कलम ३७० लागू झाल्यानंतरच जम्मू-काश्मीरच्या लोकांना आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरच्या दोन मुलींना त्यांचे नागरिकत्व आणि मालमत्तेचे घटनात्मक अधिकार दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे नेहमीच स्मरण केले जाईल. तसेच पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांनाही त्यांचे हक्क मिळणार आहेत. सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान, सामाजिक गटांनी अधोरेखित केले आहे की ते भारतासोबत असलेल्या लोकांना एकत्र करत आहेत. भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या लोकांविरोधात ही संघटना स्थापन केली जात आहे.

Comments
Add Comment

महामार्गांवर असणार आता ठेकेदारांच नाव आणि पत्ताही

नवी दिल्ली : आता प्रत्येक महामार्गाच्या सर्व एन्ट्री पॉइंटवर सहज दिसेल असा मोठा फलक लावला जाईल. या फलकावर संबंधित

Ayodhya Ram Mandir : २५ नोव्हेंबरला राम मंदिरात भाविकांसाठी 'नो एन्ट्री'! अयोध्या सोहळ्यासाठी ८ हजार निमंत्रणे; PM मोदी उपस्थित राहणार!

नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराचे (Ram Janmabhoomi Temple) अपूर्ण राहिलेले काम अलीकडेच पूर्ण झाल्याची घोषणा

लग्नात नववधूने फक्त तीनच सोन्याचे दागिने परिधान करावे, पंचायतीचे निर्देश

उत्तराखंड : दिवसेंदिवस सोन्याच्या आणि चांदीच्या किमती या गगनाला भिडत आहेत. भारतीय परंपरेनुसार आपण बहुतेक

बंगळुरूतील धक्कादायक घटना, जोडप्याने भरधाव वेगाने पाठलाग केला आणि...

बंगळुरू : कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे एक धक्कादायक घटना घडली. रस्त्यावरुन वेगाने जात असलेल्या एका कारला एका

'मोंथा' चक्रीवादळामुळे ब्रिटीशकालीन जहाज आले किनाऱ्याजवळ!

ओडिशा: 'मोंथा' चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला आहे. लाटांचा जोर वाढला आहे. या लाटांच्या जोराने एका जहाजाचा सांगाडा

फॅमिली पेन्शनसाठी केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला मिळणाऱ्या