पुण्यातल्या शिवाजीनगर जंबो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात राजीव साळुंखेंना अटक

राजीव साळुंखे हा सुजीत पाटकर आणि संजय राऊत यांचा पार्टनर असल्याची किरीट सोमय्यांनी दिली माहिती


पुणे : पुण्यातल्या शिवाजी नगर जंबो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात राजीव साळुंखेला अटक करण्यात आली आहे अशी माहिती भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी दिली. या जंबो कोव्हिड सेंटर घोटाळा प्रकरणात राजीव साळुंखे हा संजय राऊत आणि सुजीत पाटकर यांचा पार्टनर असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.


किरीट सोमय्या म्हणाले, "या प्रकरणात अजून तीन जण फरार आहेत. हेमंत गुप्ता, संजय शाह, सुजित पाटकर हे फरार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बोगस कंपनीला कंत्राट दिले होते."





आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे आणखी तीन पार्टनर्स सुजीत पाटकर, डॉ. हेमंत गुप्ता आणि संजय शहा या तिघांना अटक होणे बाकी आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना यांच्या बोगस कंपनीला जंबो कोविड सेंटरचे कंत्राट दिले गेले होते. त्यामध्ये तीन रूग्णांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात कारवाई तर होणारच, असा इशाराही किरीट सोमय्यांनी दिला आहे.


राजीव साळुंखे हे सुजित पाटकर हे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे भागीदार आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सुजित पाटकर आणि लाईफ लाईन कंपनी विरुद्ध मुंबई पोलिसांनी या आधीच गुन्हा दाखल केला आहे.



आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातही दिले होते कंत्राट


यांची कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये केल्यानंतरही संबंधित कंपनीविरोधात तत्कालीन सरकारने कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील वरळी मतदारसंघात लाइफ लाइन कंपनीला काम दिले. ब्लॅक लिस्ट झालेल्या कंपनीला पून्हा काम कसे दिले जाते, असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीने बोगस कागदपत्रं दाखवून खोट्या पद्धतीने कोविड सेंटरचे कंत्राट मिळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार