पुणे : पुण्यातल्या शिवाजी नगर जंबो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात राजीव साळुंखेला अटक करण्यात आली आहे अशी माहिती भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी दिली. या जंबो कोव्हिड सेंटर घोटाळा प्रकरणात राजीव साळुंखे हा संजय राऊत आणि सुजीत पाटकर यांचा पार्टनर असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
किरीट सोमय्या म्हणाले, “या प्रकरणात अजून तीन जण फरार आहेत. हेमंत गुप्ता, संजय शाह, सुजित पाटकर हे फरार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बोगस कंपनीला कंत्राट दिले होते.”
आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे आणखी तीन पार्टनर्स सुजीत पाटकर, डॉ. हेमंत गुप्ता आणि संजय शहा या तिघांना अटक होणे बाकी आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना यांच्या बोगस कंपनीला जंबो कोविड सेंटरचे कंत्राट दिले गेले होते. त्यामध्ये तीन रूग्णांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात कारवाई तर होणारच, असा इशाराही किरीट सोमय्यांनी दिला आहे.
राजीव साळुंखे हे सुजित पाटकर हे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे भागीदार आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सुजित पाटकर आणि लाईफ लाईन कंपनी विरुद्ध मुंबई पोलिसांनी या आधीच गुन्हा दाखल केला आहे.
यांची कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये केल्यानंतरही संबंधित कंपनीविरोधात तत्कालीन सरकारने कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील वरळी मतदारसंघात लाइफ लाइन कंपनीला काम दिले. ब्लॅक लिस्ट झालेल्या कंपनीला पून्हा काम कसे दिले जाते, असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीने बोगस कागदपत्रं दाखवून खोट्या पद्धतीने कोविड सेंटरचे कंत्राट मिळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…