जैतापुर अणुऊर्जा प्रकल्प होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतली ५०० कोटींची सुपारी!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप


मुंबई : जैतापुर अणुऊर्जा प्रकल्प होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी ५०० कोटींची सुपारी घेतली. त्यापैकी ठाकरेंनी ५ कोटी रुपये आगाऊ घेतले आणि ५०० कोटी रुपये नंतर देण्याचे ठरले होते, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे बारसूमध्ये आल्यास त्यांना पळता भुई थोडी होईल, असे थेट आव्हान राणे यांनी दिल्याने ठाकरे गोटात खळबळ उडाली आहे.


आज पत्रकारांशी संवाद साधताना भाजप नेते व केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. ठाकरेंनीच खोके घेतले. त्यामुळे दुसऱ्यांवर खोके म्हणून टीका करण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही, असे खडेबोल राणेंनी यावेळी सुनावले.


राज्यात जेव्हा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणीबाबत चाचपणी सुरु होती तेव्हा कोळशावर वीजनिर्मिती करणारे ३४ उद्योजक उद्धव ठाकरेंना भेटले होते. जैतापूरचा प्रकल्प होऊ नये, यासाठी या उद्योजकांनी उद्धव ठाकरेंसोबत ५०० कोटींचा व्यवहार केला होता. त्यावेळी ठाकरेंनी ५ कोटी रुपये आगाऊ घेतले आणि ५०० कोटी रुपये नंतर देण्याचे ठरले होते, असा खूलासा केला.


पुढे बोलताना राणे म्हणाले की, जैतापूर ऐवजी बारसूला रिफायनरी व्हावी म्हणून ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणाला विचारुन पत्र दिले? बारसू येथील उर्जा प्रकल्पाला आता ठाकरे गटाने विरोध केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे बारसूमध्ये येऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करणार आहेत असे समजते. तर मग आम्ही कोकणातच आहोत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी कोकणात येऊन दाखवावे, असे आव्हान देखील नारायण राणे यांनी दिले आहे. सोबतच आपल्याला पळता येईल का याचाही विचार करावा कारण मुंबईपर्यंत त्यांना पळत जावे लागेल. ज्यांना चालताही येत नाही, त्यांनी पळण्याचा विचारही करू नये, असा टोलाही नारायण राणेंनी लगावला.

Comments
Add Comment

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी

IRCTC Website Crash : ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! तिकीट बुक होता होईना, IRCTC वेबसाइट आणि ॲप अचानक ठप्प

दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची मोठी गैरसोय दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना आज एक मोठी तांत्रिक

सिंधुदुर्गात एसटी बसच्या संख्या वाढवा

मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे

सिंधुदुर्गात वाड्या, रस्त्यांच्या जातीवाचक नावांऐवजी आता महापुरुषांची नावे

नावे बदलणारा राज्यातील पहिला जिल्हा कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक