सर्व शंकांचे निरसन करूनच ‘बारसू’ प्रकल्प पुढे नेणार

  155

राजापूर (प्रतिनिधी): ‘एकमेकांशी होणाऱ्या संवादातून चांगली चर्चा होते व प्रश्न सुटू शकतात. तालुक्यात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत प्रकल्प समर्थक आणि विरोधकांनी गुरुवारच्या बैठकीच्या माध्यमातून उपस्थित केलेले प्रश्न आणि शंकांचे योग्य प्रकारे निरसन करून यातून मार्ग काढावा हाच आपला प्रयत्न आहे. शेती, पर्यावरणाला हानी पोहचेल, प्रदूषण होईल याचे आम्हीही कधी समर्थन करणार नाही. मात्र हा प्रकल्प आपल्या देशाचा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत आपल्या शंकांचे निरसन करून, उपस्थित केलेल्या प्रश्नांची सोडवणूक करूनच हा प्रकल्प मार्गी लावला जाईल’, अशी ग्वाही जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी दिली.


या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा जीडीपी १.८ टक्क्यांनी, तर देशाचा जीडीपी पाच ते दहा टक्यांनी वाढणार आहे. विकासाची नवी दिशा देणारा हा प्रकल्प आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने या प्रकल्पाबाबत चांगली चर्चा करून, आपल्या शंकाचे निरसन करून घेऊन सकारात्मक भूमिका घेताना देशहित डोळ्यांसमोर ठेऊन या प्रकल्पाकडे पाहूया, असे आवाहन करताना रोजगार, शिक्षण, आरोग्य याबरोबरच ज्यांची जमीन या प्रकल्पात जात नाही. मात्र ते प्रकल्पग्रस्त आहेत, त्या शेतकऱ्यांना या प्रकल्पाच्या माध्यमातून लाभ कसा होईल यासाठीही आपण प्रयत्न करू, तसा अहवाल शानसाला देऊ, असा विश्वासही सिंग यांनी यावेळी उपस्थित स्थानिक भूमिपुत्रांना दिला.


तालुक्यात बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी, प्रकल्प विरोधक आणि प्रकल्प समर्थक यांची एक बैठक जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी गुरुवारी आयोजित केली होती.

Comments
Add Comment

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

E-buses in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच एसटीच्या ताफ्यात ई-बसेस

रत्नागिरी: एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा एसटी

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली