मनसे कोंडीत, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा मैदान देण्यास नकार!

रत्नागिरी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या ६ मे रोजी रत्नागिरीमध्ये रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जवाहर मैदानावर सभा होणार होती. याबाबतचे वृत्त मनसेने जाहीरही केले होते, परंतू आज जेव्हा मनसेचे पदाधिकारी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीकडे विचारणा करण्यास गेले असता संस्थेने त्यांना जवाहर मैदानावर सभा घेण्यास नकार दिला. यामुळे सभेचा दिवस जवळ आलेला असताना मनसेची कोंडी झाली आहे.


मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण संस्थेला न विचारताच मैदानावर सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. परंतू, आज जेव्हा मनसेचे पदाधिकारी संस्थेत पोहोचले तेव्हा संस्थेने गेल्या १० वर्षांपासून आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला सभेसाठी मैदान दिलेले नाही. यामुळे या सभेलाही मैदान दिले जाणार नाही असे सांगितले. यामुळे आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मैदानाच्या विषयावरून बैठक बोलावली आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीवर भाजपचे वर्चस्व असले तरी देखील या संस्थेने कोणत्याही राजकीय पक्षांना मैदान न देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अन्य नेत्यांच्या सभा, कार्यक्रम दुसऱ्या मैदानांवर घेतल्या जातात. यामुळे मनसेकडे आता त्या मैदानांचा पर्याय उपलब्ध आहे.

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण