उन्हाच्या तडाख्याने विजेच्या मागणीत वाढ

Share

मुंबईत ३ हजार ८९३ मेगावॉटची मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकू लागल्याने राज्यभरात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले असून उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी एसी, पंखा कुलर आदी उपकरणांचा आधार घेऊ लागले आहेत. यामुळे मुंबईसह राज्यभरात विजेच्या मागणीत वाढ झाली आहे.

बुधवारी मुंबईत तब्बल ३ हजार ८९३ मेगावॉट विक्रमी विजेची मागणी नोंद झाली. तर राज्यात २४ हजार ३२६ मेगावॅट विजेची मागणी नोंदविण्यात आली. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. यामुळे नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. उकाड्यापासून सुटका मिळविण्यासाठी नागरिकांकडून पंखा, कुलर आणि एसी अशा विविध इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करत आहेत. यामुळे मुंबईसह राज्यभरातून विजेच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे.

मंगळवारी दुपारी ४ वाजेपर्यंत २४ हजार ३२६ मेगावॅट विजेची मागणी नोंदविण्यात आली. तर मुंबईत ३ हजार ५०० मेगावॅट विजेची मागणी नोंदविण्यात आली. मुंबईसह राज्यभरातून एकूण २८ हजार मेगावॅट एवढ्या विजेची मागणी नोंदविण्यात आली.

ग्राहकांच्या मागणीनुसार वीज वितरण कंपन्यांकडून विजेचा पुरवठा सुरळीत करण्यात येत असल्याने कोणत्याही भागात भारनियम करण्यात येत नाही. मात्र दिवसेंदिवस विजेची मागणी वाढू लागल्याने कंपन्या वीज पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

वीज वाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड

मुंबई महानगर प्रदेशाला वीज पुरवठा करणाऱ्या पारेषण वाहिन्यांतील तांत्रिक बिघाडामुळे ठाणे रायगड जिल्ह्यांतील काही भाग अंधारात गेला. मात्र, वीज कंपन्यांनी खबरदारी घेतल्याने महानगराला भारनियमनापासून दिलासा मिळाला. मावळ तालुक्यातील किवळे गावाजवळील डोंगराळ भागात आगीमुळे खारघर-तळेगाव वीज वाहिनीमध्ये बुधवारी दुपारी १.५५ वाजता तांत्रिक बिघाड झाला. यामुळे ठाणे, रायगड जिल्ह्यातील काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र, महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी जंगलात लागलेली आग ३.४५ वाजता आटोक्यात आणली व वीज पुरवठा सुरळीत केला. यामध्ये सुमारे ३४७ मेगावॅटचे भारनियमन करावे लागले.

Recent Posts

कोकणातील माकडे व वानरांचे निर्बीजीकरण करणार!

निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…

19 minutes ago

६४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत जाहीर

गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…

31 minutes ago

SRH vs MI, IPL 2025: सनरायजर्स हैदराबादचे मुंबईला १४४ धावांचे आव्हान, क्लासेनची जबरदस्त खेळी

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…

1 hour ago

पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार!

राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…

1 hour ago

IPL सामन्यात काळी पट्टी बांधून उतरले खेळाडू, चिअरलीडर्स गायब…पहलगाम हल्ल्यानंतर झाले हे बदल

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…

1 hour ago

अधिकाऱ्यांनी पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास होणार निलंबनाची कारवाई

मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…

1 hour ago