उन्हाच्या तडाख्याने विजेच्या मागणीत वाढ

मुंबईत ३ हजार ८९३ मेगावॉटची मागणी


मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकू लागल्याने राज्यभरात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले असून उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी एसी, पंखा कुलर आदी उपकरणांचा आधार घेऊ लागले आहेत. यामुळे मुंबईसह राज्यभरात विजेच्या मागणीत वाढ झाली आहे.


बुधवारी मुंबईत तब्बल ३ हजार ८९३ मेगावॉट विक्रमी विजेची मागणी नोंद झाली. तर राज्यात २४ हजार ३२६ मेगावॅट विजेची मागणी नोंदविण्यात आली. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. यामुळे नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. उकाड्यापासून सुटका मिळविण्यासाठी नागरिकांकडून पंखा, कुलर आणि एसी अशा विविध इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करत आहेत. यामुळे मुंबईसह राज्यभरातून विजेच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे.


मंगळवारी दुपारी ४ वाजेपर्यंत २४ हजार ३२६ मेगावॅट विजेची मागणी नोंदविण्यात आली. तर मुंबईत ३ हजार ५०० मेगावॅट विजेची मागणी नोंदविण्यात आली. मुंबईसह राज्यभरातून एकूण २८ हजार मेगावॅट एवढ्या विजेची मागणी नोंदविण्यात आली.


ग्राहकांच्या मागणीनुसार वीज वितरण कंपन्यांकडून विजेचा पुरवठा सुरळीत करण्यात येत असल्याने कोणत्याही भागात भारनियम करण्यात येत नाही. मात्र दिवसेंदिवस विजेची मागणी वाढू लागल्याने कंपन्या वीज पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.



वीज वाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड


मुंबई महानगर प्रदेशाला वीज पुरवठा करणाऱ्या पारेषण वाहिन्यांतील तांत्रिक बिघाडामुळे ठाणे रायगड जिल्ह्यांतील काही भाग अंधारात गेला. मात्र, वीज कंपन्यांनी खबरदारी घेतल्याने महानगराला भारनियमनापासून दिलासा मिळाला. मावळ तालुक्यातील किवळे गावाजवळील डोंगराळ भागात आगीमुळे खारघर-तळेगाव वीज वाहिनीमध्ये बुधवारी दुपारी १.५५ वाजता तांत्रिक बिघाड झाला. यामुळे ठाणे, रायगड जिल्ह्यातील काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र, महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी जंगलात लागलेली आग ३.४५ वाजता आटोक्यात आणली व वीज पुरवठा सुरळीत केला. यामध्ये सुमारे ३४७ मेगावॅटचे भारनियमन करावे लागले.

Comments
Add Comment

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या

विश्वविजेत्या दृष्टिहीन भारतीय महिला क्रिकेटपटू मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी

मुंबई : दृष्टिहीन महिलांच्या क्रिकेटमधील पहिला टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने ऐतिहासिक विजय

भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

"ऋषभायन-2" वैश्विक सांस्कृतिक आणि वैदिक ज्ञान महोत्सव व 'वृषभ कला' प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

Bollywood actress Shilpa Shetty... बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला आणखी एक दणका! मुंबईतील या घरावर आयकर विभागाचा छापा

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि ती तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत कायम वाढ होताना दिसत आहे.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा दिलासा! अटकेची टांगती तलवार टळली, जामीन मंजूर

मुंबई : नाशिकमधील (Nashik News) बहुचर्चित सदनिका घोटाळा प्रकरणात अडकलेले राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate)

India Squad For T20 World Cup : शुबमन गिल 'इन', पण जैस्वाल-रिंकूचा पत्ता कट? टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचे 'मिशन २०२६' तयार, 'या' १५ धुरंधरांच्या खांद्यावर वर्ल्ड कपची धुरा

अहमदाबाद : आगामी २०२६ टी२० वर्ल्ड कपसाठी भारतीय क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. भारतीय क्रिकेट