अदानी समुहाची कर्ज फेडण्याची क्षमता वाढली, जागतिक बँकेने दिलेल्या कर्जात वाढ

नवी दिल्ली: गेल्या वर्षभरात अदानी समूहाच्या कर्ज फरत फेडण्याच्या क्षमतेत वाढ झाली आहे. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, एका वर्षात अदानीने घेतलेल्या कर्जात सुमारे २१ टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी जागतिक बँकांचे या कर्जातील प्रमाण एक तृतीयांशने वाढले आहे. मार्चअखेर अदानी समूहाने घेतलेल्या कर्जांपैकी २९ टक्के कर्ज हे जागतिक बँकांकडून देण्यात आले आहे. ज्याअर्थी जागतिक बँका अदानीला कर्ज देत आहेत त्याअर्थी अदानी समुहाची झाकोळलेली प्रतिमा जागतिक बाजारपेठेत उंचवल्याचे चित्र आहे.


अदानी समूहाच्या ७ सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण कर्ज ३१ मार्च २०२३ पर्यंत २०.७ टक्क्यांनी वाढले. ते २.३ लाख कोटी रुपये (२८ अब्ज डॉलर) इतके वाढले आहे. अदानी समूहाच्या कर्जामध्ये बाँड्सचा वाटा ३९ टक्के आहे. २०१६ मध्ये तो १४ टक्के होता. त्याच वेळी देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने अदानी समूहाला सुमारे २७० अब्ज रुपये (३.३ अब्ज डॉलर) कर्ज दिले आहे. एसबीआयच्या अध्यक्षांनी फेब्रुवारीमध्ये ही माहिती दिली होती.

Comments
Add Comment

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी

बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय

पाटणा : बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. विधानसभेनंतर