मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सायंकाळी मुंबईत येणार आहेत. आज सायंकाळी भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत अमित शहांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण काय आहे, यासोबतच मुंबई महानगर पालिका निवडणुकांसंदर्भात मुंबईत भाजपची काय स्थिती आहे, याचा आढावा अमित शहा या बैठकीत घेणार आहेत.
या बैठकीत अमित शहा ‘मिशन ४५’ आणि ‘मिशन मुंबई’ अंतर्गत भाजपची काय स्थिती आहे याचा आढावा घेणार आहेत.
यानंतर ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना उद्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील खारघर येथे उद्या हा पुरस्काळ सोहळा पार पडणार आहे. अमित शाहांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दरम्यान या पुरस्कार सोहळ्याच्या तयारीची काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. या कार्यक्रमासाठी १५ ते २० लाख समर्थक येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या रात्री १२ पर्यंत पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील अवजड वाहतूक बंद असणार आहे.
तर हार्बर रेल्वेमार्गावरील मेगा ब्लॉकदेखील रद्द करण्यात आला आहे. मेनलाईन वर माटुंगा-मुलुंड जलद मार्गावर अगोदर जाहीर केल्याप्रमाणे मेगा ब्लॉक राहणार आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा केली होती. त्यानंतर मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरचा मेगा ब्लॉक रद्द केला आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईत येत असताना त्यांच्या अगदी जवळचे असणारे मंत्री चंद्रकांत पाटील मात्र कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. चंद्रकांत पाटील यांनी बाबरी संदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीका झाली होती. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर भाजपचे काही नेते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील कोल्हापुरात असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…