राज्य व केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवाव्यात

वेंगुर्ले येथील मेळाव्यात भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे प्रतिपादन


वेंगुर्ले ( प्रतिनिधी ): केंद्र व राज्य शासनामार्फत आज विविध योजना राबविल्या जात आहेत. वेंगुर्ले तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी यांनी ग्रामपंचायत स्तरावर योजनांचा अभ्यास करून राज्य व केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवाव्यात. तरच सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वेंगुर्ले येथे केले.


भाजपाच्या महाविजय २०२४ जनसंपर्क अभियान अंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा पं.स. मतदारसंघ व वेंगुर्ले शहराचा लाभार्थी मेळावा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील साई मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी आयुष्यमान भारत योजना, सुकन्या समृद्धी योजना, ई श्रम कार्ड योजना च्या २०० लाभार्थीना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोफत कार्ड वाटपचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा कार्यकारिणी सचिव शरद चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक, तालुका सरचिटणीस बाबली वायगणकर, सोमनाथ टोमके, माजी उपनगराध्यक्ष शीतल आंगचेकर, सुषमा प्रभुखानोलकर, सुरेंद्र चव्हाण, पूनम जाधव, वसंत तांडेल, मनवेल फर्नांडिस, दादा केळुसकर, पपु परब, सारीका काळसेकर, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, प्रशांत आपटे, धर्मराज कांबळी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना तेली म्हणाले, विविध योजना केंद्र सरकार मार्फत राबविल्या जात आहेत. शेतकरी सन्मान योजनेत सहा हजार रुपये मिळत आहेत.


राज्य सरकार कडून आता त्यात वाढ करण्यात आली असून एकूण बारा हजार रुपये मिळणार आहेत. महिलांना एस टी मध्ये ५० टक्के सवलत, गोपीनाथ मुंडे अपघात योजना यासह अन्य योजना आहेत. त्यांचा अभ्यास करा व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवा. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या जिल्ह्यासाठी भरपूर निधी दिला आहे. तसेच त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रिपद असल्याने त्याचा येथील विकासासाठी फायदा होणार आहे. त्यासाठी आवश्यक रस्ते विकासकामांची यादी बनवा व ती राज्यस्तरापर्यंत मंत्री चव्हाण यांच्याकडे द्या, असेही तेली यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण