कोण शिक्षणमंत्री? नारायण राणे भडकले

सिंधुदूर्ग: केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मध्यस्ती केल्यानंतर तब्बल १४ दिवस सुरू असलेले हे डी. एड बेरोजगारांचे उपोषण रविवारी रात्री उशिरा मागे घेण्यात आले आहे. मात्र, जे आंदोलन नारायण राणे यांच्यामुळे मागे घेतले गेले त्याचे श्रेय दिपक केसरकर घेत असल्याचे दिसून आले आहेत. आंदोलकांपैकी एकाने शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या संदर्भात केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना माहिती दिल्यानंतर नारायण राणे चांगलेच भडकले आणि सर्वांसमोरच म्हणाले ‘कोण शिक्षणमंत्री?’


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मध्यस्थीनंतर अखेर डी.एड बेरोजगारांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी संध्याकाळी उशिरा ओरोस येथील डी.एड बेरोजगारांच्या उपोषणास भेट दिली. गंल्या १४ दिवसांपासून या डी.एड बेरोजगारांनी विविध प्रश्नासाठी सिंदुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे उपोषण सुरु केले होते.


नारायण राणे म्हणाले की, तुमचे प्रश्न महत्वाचे आहेत. मी उद्या मुंबईत गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. राज्यातील डी. एड बेरोजगारांचे प्रश्न त्यांच्या समोर मांडणार आहे. तसेच योग्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Comments
Add Comment

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या