कोण शिक्षणमंत्री? नारायण राणे भडकले

सिंधुदूर्ग: केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मध्यस्ती केल्यानंतर तब्बल १४ दिवस सुरू असलेले हे डी. एड बेरोजगारांचे उपोषण रविवारी रात्री उशिरा मागे घेण्यात आले आहे. मात्र, जे आंदोलन नारायण राणे यांच्यामुळे मागे घेतले गेले त्याचे श्रेय दिपक केसरकर घेत असल्याचे दिसून आले आहेत. आंदोलकांपैकी एकाने शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या संदर्भात केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना माहिती दिल्यानंतर नारायण राणे चांगलेच भडकले आणि सर्वांसमोरच म्हणाले ‘कोण शिक्षणमंत्री?’


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मध्यस्थीनंतर अखेर डी.एड बेरोजगारांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी संध्याकाळी उशिरा ओरोस येथील डी.एड बेरोजगारांच्या उपोषणास भेट दिली. गंल्या १४ दिवसांपासून या डी.एड बेरोजगारांनी विविध प्रश्नासाठी सिंदुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे उपोषण सुरु केले होते.


नारायण राणे म्हणाले की, तुमचे प्रश्न महत्वाचे आहेत. मी उद्या मुंबईत गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. राज्यातील डी. एड बेरोजगारांचे प्रश्न त्यांच्या समोर मांडणार आहे. तसेच योग्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Comments
Add Comment

माणगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका

माणगाव-इंदापूर बायपासचे काम सुरू माणगाव (वार्ताहर): मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे. या रखडलेल्या

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या

सिंधुदुर्ग ठरणार एआय मॉडेल, मंत्री नितेश राणेंचे स्वप्न पूर्ण होणार

सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे एआय युग आहे. प्रशासनही एआय तंत्रज्ञानाचा वापर करतंय आणि वेगाने विकास होतोय!