कोण शिक्षणमंत्री? नारायण राणे भडकले

सिंधुदूर्ग: केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मध्यस्ती केल्यानंतर तब्बल १४ दिवस सुरू असलेले हे डी. एड बेरोजगारांचे उपोषण रविवारी रात्री उशिरा मागे घेण्यात आले आहे. मात्र, जे आंदोलन नारायण राणे यांच्यामुळे मागे घेतले गेले त्याचे श्रेय दिपक केसरकर घेत असल्याचे दिसून आले आहेत. आंदोलकांपैकी एकाने शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या संदर्भात केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना माहिती दिल्यानंतर नारायण राणे चांगलेच भडकले आणि सर्वांसमोरच म्हणाले ‘कोण शिक्षणमंत्री?’


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मध्यस्थीनंतर अखेर डी.एड बेरोजगारांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी संध्याकाळी उशिरा ओरोस येथील डी.एड बेरोजगारांच्या उपोषणास भेट दिली. गंल्या १४ दिवसांपासून या डी.एड बेरोजगारांनी विविध प्रश्नासाठी सिंदुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे उपोषण सुरु केले होते.


नारायण राणे म्हणाले की, तुमचे प्रश्न महत्वाचे आहेत. मी उद्या मुंबईत गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. राज्यातील डी. एड बेरोजगारांचे प्रश्न त्यांच्या समोर मांडणार आहे. तसेच योग्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Comments
Add Comment

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका