'नॅशनल हेराल्ड घोटाळ्यातील पैसे कुठे लपवले?'

राहुल गांधींच्या ट्विटला हिमंता बिस्वा यांचे जोरदार प्रत्त्युत्तर


नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून अदानी समुहाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने भाजपवर निशाणा साधत आहेत. त्यांनी शनिवारी एक शब्दकोडे असलेला फोटो ट्विट केला आहे. यावरुन राहुल गांधी यांनी गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंधिया, किरण कुमार रेड्डी, हिमंता बिस्वा सरमा आणि अनिल अँटनी यांच्यावर अदानी यांच्यावर निशाणा साधला. यावर आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे.


राहुल गांधींचे ट्विट रि-ट्विट करत हिमंता बिस्वा सरमा यांनी प्रत्यारोप केला. "आम्ही तुम्हाला कधीही विचारले नाही की तुम्ही बोफोर्स आणि नॅशनल हेराल्ड घोटाळ्यांची कमाई कुठे लपवली. आणि तुम्ही किती वेळा ओटावियो क्वात्रोचीला भारतीय म्हटले. "आम्हाला परवानगी दिली. आता आपण कोर्टातच भेटू.", असे मुख्यमंत्री बिस्वा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.





ओटावियो क्वात्रोची हे इटलीचे प्रसिद्ध उद्योगपती होते. ज्यांच्यावर राजीव गांधी सरकारच्या काळात बोफोर्स घोटाळ्यात दलालीच्या माध्यमातून लाच घेतल्याचा आरोप केला होता. २८ एप्रिल २००९ रोजी सीबीआयने क्वात्रोचीला क्लीन चिट दिली आणि इंटरपोलला त्यांच्यावर जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस मागे घेण्याचे आवाहन केले. सीबीआयच्या आवाहनावर इंटरपोलने क्वात्रोचीवरील रेड कॉर्नर हटवला. क्वात्रोची यांना क्लीन चिट देण्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी केला. १३ जुलै २०१३ रोजी, वयाच्या ७४ व्या वर्षी, ओटावियो क्वात्रोची यांचे इटलीतील मिलान येथे स्ट्रोकमुळे निधन झाले.


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सकाळी एक शब्दकोडे ट्विट केले, यामध्ये अदानी व्यतिरिक्त इतर अनेक नावेही अक्षरात लिहिली होती. ज्यामध्ये गुलाम नबी आझाद, सिंधिया, किरण कुमार रेड्डी, हिमंता बिस्वा सरमा आणि अनिल अँटोनी यांची नावे दिसत आहेत. यासोबतच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'तो सत्य लपवतो, त्यामुळेच तो दररोज दिशाभूल करतो. प्रश्न एकच आहे - अदानींच्या कंपन्यांमध्ये २०,००० कोटी बेनामी पैसा कोणाचा आहे?', असे ट्विटमध्ये म्हटले आहेत.

Comments
Add Comment

Nirmala Sitharaman : ऐतिहासिक बजेटला कांजीवरमचा थाट! अर्थसंकल्पाआधीच निर्मला सीतारमण यांच्या साडीची पडली भुरळ...

नवी दिल्ली : आज १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आपला सलग नवा

‘जा-मर’ म्हणणे जीवन संपविण्यास प्रवृत्त करणे नव्हे!

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल कोची : दोन व्यक्तीच्या भांडणादरम्यान एकाने जा आणि मर यांसारखी विधाने करणे हे

किश्तवाड जिल्ह्यातील मोबाईल, इंटरनेट सेवा बंद

नवी दिल्ली : श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात लपून बसलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा

राम मंदिर गर्भगृहात ४०० वर्षं जुन्या संस्कृत वाल्मीकी रामायणाची प्रत

मंदिराच्या भित्तिचित्र आणि इतर सुविधा अंतिम टप्प्यात अयोध्या : श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या

एआयच्या सल्ल्यामुळे ४५ वर्षीय व्यक्ती आजाराच्या विळख्यात

नवी दिल्ली : वैद्यकीय उपचारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आंधळेपणाने विश्वास ठेवणे किती धोकादायक ठरू शकते,

‘मेड इन इंडिया’ अनमॅन्ड क्राफ्ट भारतीय नौसेनेत

नवी दिल्ली : भारतीय नौसेनेच्या क्षमतेत लवकरच मोठी भर पडणार आहे. पुण्यातील सागर डिफेन्स इंजिनिअरिंग या