शरद पवारांचा यूटर्न! काँग्रेसवर घणाघाती टीका करत म्हणाले, अदानींबाबत विधाने करणाऱ्यांची.....

  218

नवी दिल्ली: हिंडेनबर्ग प्रकरणी काँग्रेसकडून वारंवार मागणी होत असलेल्या जीपीसी चौकशीची गरज नाही असे खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच म्हटले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी काँग्रेसवरच घणाघाती टीका करत अदानींना क्लीन चिट दिली आहे.


काँग्रेसवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, हिंडेनबर्ग अहवालातून अदानी समूहाला टार्गेट केले जात आहे. अदानी समूहाने काही चुकीचे केले असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. काँग्रेसकडून अदानी प्रकरणाला जास्त महत्व दिले गेले. अदानींबाबत विधाने करणाऱ्यांची पार्श्वभूमी काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थीत केला.


शरद पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांची युती आहे. पण, आम्ही काँग्रेसच्या विचारांशी सहमत नाही. अदानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञांची समिती स्थापन करून चौकशी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे जेपीसी चौकशीची गरज नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

Comments
Add Comment

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये

IMD Monsoon Alert: जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार, हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने (IMD) जुलै महिन्यासाठी दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. देशवासीयांना या महिन्यात