नवी दिल्ली: हिंडेनबर्ग प्रकरणी काँग्रेसकडून वारंवार मागणी होत असलेल्या जीपीसी चौकशीची गरज नाही असे खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच म्हटले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी काँग्रेसवरच घणाघाती टीका करत अदानींना क्लीन चिट दिली आहे.
काँग्रेसवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, हिंडेनबर्ग अहवालातून अदानी समूहाला टार्गेट केले जात आहे. अदानी समूहाने काही चुकीचे केले असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. काँग्रेसकडून अदानी प्रकरणाला जास्त महत्व दिले गेले. अदानींबाबत विधाने करणाऱ्यांची पार्श्वभूमी काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थीत केला.
शरद पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांची युती आहे. पण, आम्ही काँग्रेसच्या विचारांशी सहमत नाही. अदानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञांची समिती स्थापन करून चौकशी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे जेपीसी चौकशीची गरज नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…