उदय सामंत, संभाजीराजे स्पीडबोटीला अपघात

Share

अपघातातून सुदैवाने बचावले

अलिबाग (प्रतिनिधी) : मुंबईहून स्पीडबोटीने अलिबागला कार्यक्रमासाठी निघालेले रायगडचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या बोटीला आज अपघात झाला. मात्र यातून हे दोघे सुदैवाने थोडक्यात बचावले. काही क्षणांसाठी स्पीडबोट चालकांचे नियंत्रण सुटले. परंतु नंतर लगेच त्याने बोटीवर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला.

३५० व्या शिवराज्याभिषक सोहळ्याच्या तयारीची आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होती. या बैठकीसाठी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि संभाजीराजे आज मुंबई येथून सागरीमार्गाने स्पीडबोटने अलिबागला जात होते. सुरुवातीला बोटीचा वेग कमी होता. त्यानंतर बोट मांडवा जेट्टीजवळ आली तेव्हा बोटीचा वेग वाढला. त्यामुळे काही क्षणांसाठी चालकाचे नियंत्रण सुटले आणि बोट जेट्टीच्या दोन खांबांना घासली. तेव्हा काय घडतंय हे क्षणभर दोघांनाही समजले नाही. त्यांच्या स्वागतासाठी आमदार महेंद्र दळवी हेही मांडवा जेट्टीवर उपस्थित होते. समोरचा प्रसंग पाहून त्यांच्याही हृदयाचा ठोका चुकला. मात्र सुदैवाने चालकाने लगेच बोटीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे अनर्थ टळला. पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेच्यावेळी पत्रकारांना हा प्रकार सांगितला. यापूर्वीही पालकमंत्री उदय सामंत यांची बोट भरसमुद्रात बंद पडली होती. त्यावेळी ते दुसऱ्या बोटीने किनाऱ्यावर आले होते.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

1 hour ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

2 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

4 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago