उदय सामंत, संभाजीराजे स्पीडबोटीला अपघात

अपघातातून सुदैवाने बचावले


अलिबाग (प्रतिनिधी) : मुंबईहून स्पीडबोटीने अलिबागला कार्यक्रमासाठी निघालेले रायगडचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या बोटीला आज अपघात झाला. मात्र यातून हे दोघे सुदैवाने थोडक्यात बचावले. काही क्षणांसाठी स्पीडबोट चालकांचे नियंत्रण सुटले. परंतु नंतर लगेच त्याने बोटीवर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला.


३५० व्या शिवराज्याभिषक सोहळ्याच्या तयारीची आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होती. या बैठकीसाठी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि संभाजीराजे आज मुंबई येथून सागरीमार्गाने स्पीडबोटने अलिबागला जात होते. सुरुवातीला बोटीचा वेग कमी होता. त्यानंतर बोट मांडवा जेट्टीजवळ आली तेव्हा बोटीचा वेग वाढला. त्यामुळे काही क्षणांसाठी चालकाचे नियंत्रण सुटले आणि बोट जेट्टीच्या दोन खांबांना घासली. तेव्हा काय घडतंय हे क्षणभर दोघांनाही समजले नाही. त्यांच्या स्वागतासाठी आमदार महेंद्र दळवी हेही मांडवा जेट्टीवर उपस्थित होते. समोरचा प्रसंग पाहून त्यांच्याही हृदयाचा ठोका चुकला. मात्र सुदैवाने चालकाने लगेच बोटीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे अनर्थ टळला. पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेच्यावेळी पत्रकारांना हा प्रकार सांगितला. यापूर्वीही पालकमंत्री उदय सामंत यांची बोट भरसमुद्रात बंद पडली होती. त्यावेळी ते दुसऱ्या बोटीने किनाऱ्यावर आले होते.

Comments
Add Comment

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी

IRCTC Website Crash : ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! तिकीट बुक होता होईना, IRCTC वेबसाइट आणि ॲप अचानक ठप्प

दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची मोठी गैरसोय दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना आज एक मोठी तांत्रिक

सिंधुदुर्गात एसटी बसच्या संख्या वाढवा

मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे

सिंधुदुर्गात वाड्या, रस्त्यांच्या जातीवाचक नावांऐवजी आता महापुरुषांची नावे

नावे बदलणारा राज्यातील पहिला जिल्हा कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदला प्रक्रियेत सावळागोंधळ

चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी,