उदय सामंत, संभाजीराजे स्पीडबोटीला अपघात

  422

अपघातातून सुदैवाने बचावले


अलिबाग (प्रतिनिधी) : मुंबईहून स्पीडबोटीने अलिबागला कार्यक्रमासाठी निघालेले रायगडचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या बोटीला आज अपघात झाला. मात्र यातून हे दोघे सुदैवाने थोडक्यात बचावले. काही क्षणांसाठी स्पीडबोट चालकांचे नियंत्रण सुटले. परंतु नंतर लगेच त्याने बोटीवर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला.


३५० व्या शिवराज्याभिषक सोहळ्याच्या तयारीची आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होती. या बैठकीसाठी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि संभाजीराजे आज मुंबई येथून सागरीमार्गाने स्पीडबोटने अलिबागला जात होते. सुरुवातीला बोटीचा वेग कमी होता. त्यानंतर बोट मांडवा जेट्टीजवळ आली तेव्हा बोटीचा वेग वाढला. त्यामुळे काही क्षणांसाठी चालकाचे नियंत्रण सुटले आणि बोट जेट्टीच्या दोन खांबांना घासली. तेव्हा काय घडतंय हे क्षणभर दोघांनाही समजले नाही. त्यांच्या स्वागतासाठी आमदार महेंद्र दळवी हेही मांडवा जेट्टीवर उपस्थित होते. समोरचा प्रसंग पाहून त्यांच्याही हृदयाचा ठोका चुकला. मात्र सुदैवाने चालकाने लगेच बोटीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे अनर्थ टळला. पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेच्यावेळी पत्रकारांना हा प्रकार सांगितला. यापूर्वीही पालकमंत्री उदय सामंत यांची बोट भरसमुद्रात बंद पडली होती. त्यावेळी ते दुसऱ्या बोटीने किनाऱ्यावर आले होते.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण