ठाण्यात मुख्यमंत्र्यांचा एल्गार! म्हणाले सावरकरांचा अपमान....

ठाणे: ठाण्यातील सावरकर यात्रेच्या समारोपावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वीर सावरकरांचा अपमान कोणीही सहन करणार नाही असा एल्गार केला. एकनाथ शिंदे म्हणाले की, सावरकरांबद्दल एकही शब्द कोणी ऐकणार नाही, सहन करणार नाही, म्हणून ही गौरव यात्रा काढण्यात आली आहे. त्याची छोटीशी झलक आज या ठाण्यातील गौरव यात्रेतून तुम्हाला दिसेल. सावरकरांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी ही यात्रा भाजपा आणि शिवसेनेने काढली आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांचे अनुकरण करणाऱ्यांचं मी या यात्रेत स्वागत करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. ठाण्यातील सावरकर गौरव यात्रेदरम्यान त्यांनी माध्यमांशी बातचीत केली तेव्हा ते बोलत होते.


मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, वीर सावरकरांची देशभक्ती, राष्ट्रभक्ती, प्रखर हिंदुत्ववाद प्रत्येक देशवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु सातत्याने त्यांचा अपमान केला जात आहे. जाणून बुजून त्यांचा त्यांच्याविरोधात बोललं जात आहे. या लोकाना सडेतोड उत्तर देण्यासाठी ही यात्रा काढली आहे.


राहुल गांधी यांनी केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्ध भाजप आणि शिवसेनेने काढलेली ठाण्यातील सावरकर गौरव यात्रा आज समाप्त झाली. ही यात्रा महाराष्ट्रभर सुरु राहणार आहे. संध्याकाळी मुंब्रा तसेच इतर विभागात ही यात्रा काढली जाईल. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे संध्याकाळी ५ वाजता ही यात्रा काढली जाईल.



आशिष शेलार यांचाही हल्लाबोल


दरम्यान, दादर येथील यात्रे दरम्यान आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान वारंवार काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडून होत आहे. देशभक्तांचा अवमान होत आहे त्यामुळे देशभक्त कसे रस्त्यावर येतात हे पहा. सावरकर यांच्या विचारांवर चालायच असेल, तर ठाकरे यांनी काँग्रेस सोडावी असेही शेलार यावेळी म्हणाले. हिंमत असेल तर उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांना माफी मागायला लावावी.


Comments
Add Comment

सर्पदंश झालेल्या मावशीचाही उपचारादरम्यान मृत्यू!

मृतांच्या नातेवाइकांचे मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन कल्याण (वार्ताहर) : साडेचार वर्षांच्या

बदलापूरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोपले

बदलापूर : अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई सोमवारी पश्चिम

उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून मुलाचा मृत्यू

डोंबिवली : उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार २८ तारखेला रात्री आठ

एका जाडजूड बॅगेने घेतला रेल्वे प्रवाशांचा जीव, मुंब्रा अपघात प्रकरणी हाती आली नवी माहिती

मुंब्रा : जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला होता. काही प्रवासी रेल्वे रुळावर तसेच दोन

डोंबिवलीत प्रियकराने केली आत्महत्या, पण नेमकं कारण काय? खरंच प्रेयसीसोबत वाद झाला होता का?

प्रेमसंबंधातील वाद की काहीतरी वेगळं? डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर परिसरात शनिवारी दुपारी घडलेल्या

ठाणे हायस्पीड रेल्वे स्टेशन होणार देशातील पहिले मल्टीमोडल इंटीग्रेटेड स्टेशन

आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन ठाणे : ठाण्यात सर्व वाहतूक सुविधांचे जंक्शन तयार होणार आहे. शहराचे आमूलाग्र