ठाण्यात मुख्यमंत्र्यांचा एल्गार! म्हणाले सावरकरांचा अपमान....

ठाणे: ठाण्यातील सावरकर यात्रेच्या समारोपावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वीर सावरकरांचा अपमान कोणीही सहन करणार नाही असा एल्गार केला. एकनाथ शिंदे म्हणाले की, सावरकरांबद्दल एकही शब्द कोणी ऐकणार नाही, सहन करणार नाही, म्हणून ही गौरव यात्रा काढण्यात आली आहे. त्याची छोटीशी झलक आज या ठाण्यातील गौरव यात्रेतून तुम्हाला दिसेल. सावरकरांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी ही यात्रा भाजपा आणि शिवसेनेने काढली आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांचे अनुकरण करणाऱ्यांचं मी या यात्रेत स्वागत करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. ठाण्यातील सावरकर गौरव यात्रेदरम्यान त्यांनी माध्यमांशी बातचीत केली तेव्हा ते बोलत होते.


मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, वीर सावरकरांची देशभक्ती, राष्ट्रभक्ती, प्रखर हिंदुत्ववाद प्रत्येक देशवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु सातत्याने त्यांचा अपमान केला जात आहे. जाणून बुजून त्यांचा त्यांच्याविरोधात बोललं जात आहे. या लोकाना सडेतोड उत्तर देण्यासाठी ही यात्रा काढली आहे.


राहुल गांधी यांनी केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्ध भाजप आणि शिवसेनेने काढलेली ठाण्यातील सावरकर गौरव यात्रा आज समाप्त झाली. ही यात्रा महाराष्ट्रभर सुरु राहणार आहे. संध्याकाळी मुंब्रा तसेच इतर विभागात ही यात्रा काढली जाईल. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे संध्याकाळी ५ वाजता ही यात्रा काढली जाईल.



आशिष शेलार यांचाही हल्लाबोल


दरम्यान, दादर येथील यात्रे दरम्यान आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान वारंवार काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडून होत आहे. देशभक्तांचा अवमान होत आहे त्यामुळे देशभक्त कसे रस्त्यावर येतात हे पहा. सावरकर यांच्या विचारांवर चालायच असेल, तर ठाकरे यांनी काँग्रेस सोडावी असेही शेलार यावेळी म्हणाले. हिंमत असेल तर उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांना माफी मागायला लावावी.


Comments
Add Comment

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा

प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत.

बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे

भिवंडीत विकासकाकडून १०० कोटींचा घोटाळा?

फसवणूक झालेल्या कुटुंबाचे आ. संजय केळकर यांना साकडे ठाणे  : भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत