संजय राऊतांनी असा कोणता पराक्रम केलाय की त्यांना धमकी मिळाली? निलेश राणे यांची बोचरी टीका

सिंधुदूर्ग: संजय राऊत धमकी प्रकरणावरुन राज्य सरकारवर टीका करत असताना भाजप नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी असला कोणता पराक्रम केला आहे, की त्यांना धमकी मिळाली? असा सवाल उपस्थित करत, राऊत हे केवळ स्वत:चं महत्व आणि किंमत वाढवण्यासाठी हे सर्व करत असल्याची बोचरी टीका निलेश राणे यांनी केली आहे. ते सिंधुदूर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. याआधी त्यांनी राऊत यांचा ट्वीटरवरुन समाचार घेतला आहे. संजय राऊत यांना त्यांचा जावई सुद्धा त्यांना विचारत नाही. तर इतर कोण धमकी देणार अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे. तर, संजय राऊत म्हणजे साडेनऊचं बातमीपत्र असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे.





या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खुलासा करताना सांगितले की, संजय राऊतांना जी धमकी आली ती दारुच्या नशेत एका व्यक्तीने दिली असा प्राथमिक रिपोर्ट आहे. मात्र संपूर्ण तपास केला जाईल. कुणीही धमकी दिली असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात कुणी कुणाला धमकी दिली तरीदेखील याठिकाणी सरकार, पोलीस शांत बसणार नसल्याचे स्पष्ट केले.

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण