देश तुमच्या बापाचा माल आहे का? माजी खासदार निलेश राणे यांचा ठाकरे गटासह काँग्रेसवर चौफेर हल्लाबोल

सुषमा अंधारेंनी मर्यादा पाळल्या पाहिजेत आणि संजय राऊत तर रिकाम टेकडा माणूस


बीड : राजकारणात आजकाल कोणीही उठतो आणि बेताल भाषा वापरतात त्यावर मर्यादा आल्या पाहिजे. कोणताही माहिती नसताना काँग्रेस नेते राहुल गांधी हे वीर सावरकरांचा अपमान करतात. त्याबद्दल न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आणि खासदारकीही रद्द झाली. इकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ज्या तऱ्हेने बोलतात, जसे की त्या दोन-तीन टर्म निवडणुका लढल्या आहेत. कधी मंत्री होत्या का? त्यामुळे नेमका हा कॉन्फिडन्स त्यांच्यात कुठून आला? हेच कळत नसल्याचे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी म्हटले आहे.


२०२० मधील प्रकरणाच्या सुनावणीसाठी राणे आज केज न्यायालयात हजर झाले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना निलेश राणे म्हणाले की, अंधारे एकदाही निवडणूक लढल्या नाहीत. माझ्यापेक्षा त्या तीन वर्षांनी लहान आहेत. अंधारेताई जी भाषा वापरतात त्यावर मर्यादा आली पाहिजे. मर्यादा देखील पाळल्या पाहिजे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर बोलता, कोणत्या अधिकाराने तुम्ही बोलता, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.



संजय राऊत तर रिकाम टेकडा माणूस


दरम्यान संजय राऊत यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे. संजय राऊत रिकाम टेकडे आहेत. त्यांना दुसरे काहीच काम नाही. महाराष्ट्रात त्यांची किंमत काय? पत्रा चाळचा तो आरोपी आहे. संजय राऊत याचा काय संबंध, असे म्हणत निलेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.



देश तुमच्या बापाचा माल आहे का?


काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांना मिळालेला सरकारी बंगला खाली करण्याची सूचना दिली. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. याबाबत ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत निलेश राणे यांनी टीका केली आहे.





निलेश राणे यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “२००९ ला मी खासदार झालो तेव्हा राहुल गांधी दुसऱ्यांदा खासदार झाले पण त्यांना मंत्री कॅटेगिरीचा बंगला मिळाला. AICC व IYC ऑफिस शासकीय बंगल्यात आहेत. सोनिया गांधी ज्या घरात राहतात ते घर भारताच्या पंतप्रधानांकडे असलं पाहिजे पण त्या आजही तिथे राहतात”, अशा शब्दांत टीका केली आहे. तसेच, देश तुमच्या बापाचा माल आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी