पाण्यात पडलेल्या बॉलने घेतला विद्यार्थ्याचा बळी

कल्याण : अंबरनाथ तालुक्यातील नेवाळीमध्ये ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना कल्याण पूर्वेतील कैलास नगरमध्ये इमारत उभी करण्यासाठी भला मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला असून त्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात बुडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.


शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रेहान शेख हा विद्यार्थी शाळेला दांडी मारून या खड्ड्याच्या परिसरात खेळत होता. त्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडलेला बॉल काढण्यासाठी रेहान गेला असता बॉल हाती लागला नाही, मात्र त्या बॉलने रेहानचा जीव घेतला.


रेहान घरातून शाळेत जाण्यासाठी निघाला मात्र तो शाळेत पोहोचलाच नाही. त्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात बुडून रेहानचा मृत्यू झाला. घटनास्थळी शाळेची बॅग आढळून आली. याच बॅगेवरून रेहानच्या नातेवाइकांनी रेहानची ओळख पटवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

रील्सस्टारना मालिका आणि चित्रपटांमध्ये संधी देण्याबाबत 'या' मराठी कलाकाराने व्यक्त केली नाराजी

मुंबई : आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहेतच. याच

भरधाव पोलो कार थेट धडकली मेट्रोच्या खांबाला ; पुण्यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू,

पुणे : बंडगार्डन मेट्रो स्टेशनखाली भीषण अपघात झाला. काळ्या रंगाच्या पोलो कारने भरधाव वेगात जाताना अचानक

भीषण अग्नितांडव; सुपरमार्केटमधील आगीत लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू

मेक्सिको : सणासुदीच्या काळात मेक्सिकोच्या सोनारा राज्यात घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

टाटा मिनी बसचा अपघात, गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला निघालेल्या दोघांचा मृत्यू

कर्जत : समृद्धी महामार्गावर कर्जतजवळ बोगद्यात टाटा मिनी बसचा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचे