पाण्यात पडलेल्या बॉलने घेतला विद्यार्थ्याचा बळी

कल्याण : अंबरनाथ तालुक्यातील नेवाळीमध्ये ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना कल्याण पूर्वेतील कैलास नगरमध्ये इमारत उभी करण्यासाठी भला मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला असून त्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात बुडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.


शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रेहान शेख हा विद्यार्थी शाळेला दांडी मारून या खड्ड्याच्या परिसरात खेळत होता. त्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडलेला बॉल काढण्यासाठी रेहान गेला असता बॉल हाती लागला नाही, मात्र त्या बॉलने रेहानचा जीव घेतला.


रेहान घरातून शाळेत जाण्यासाठी निघाला मात्र तो शाळेत पोहोचलाच नाही. त्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात बुडून रेहानचा मृत्यू झाला. घटनास्थळी शाळेची बॅग आढळून आली. याच बॅगेवरून रेहानच्या नातेवाइकांनी रेहानची ओळख पटवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Ranapati Shivray Swari Agra : दिग्पाल लांजेकरांच्या चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका

सध्या सोशल मीडियावर 'रणपती शिवराय स्वारी आग्रा' या चित्रपटाची चर्चा सगळीकडे सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज

काही लोक Ai चा वापर करून माझ्या नावाने...'फेक न्यूज' पसरवणाऱ्यांवर अथर्व सुदामेचा संताप!"

मुंबई : अथर्व सुदामे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पुणे महानगर परिवहन

दीपिका पादुकोणने आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली मोठी भेट, नव्या क्रिएटिव पिढीला पुढे नेण्यासाठी ‘द ऑनसेट प्रोग्राम’चा शुभारंभ

अभिनेत्री, निर्माती आणि मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या दीपिका पादुकोण यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नव्या आणि

केवळ ७ कोटींचा दाक्षिणात्य सिनेमा, पण थरार हॉलीवूडला टक्कर देणारा वाचा सविस्तर

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने गेल्या काही वर्षांत दर्जेदार कथानक, जबरदस्त सस्पेन्स आणि हादरवून

ठाण्यात बिबट्यांची दहशत

येऊर, वारली पाड्यात दोन श्वानांवर हल्ला ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या आदिवासी पाड्यांमध्ये

बंड शमले, अपक्ष वाढवणार ताप

ठाणे पालिका निवडणुकीत ८६ अपक्ष उमेदवार मैदानात ठाणे : ठाणे पालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील