पाण्यात पडलेल्या बॉलने घेतला विद्यार्थ्याचा बळी

कल्याण : अंबरनाथ तालुक्यातील नेवाळीमध्ये ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना कल्याण पूर्वेतील कैलास नगरमध्ये इमारत उभी करण्यासाठी भला मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला असून त्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात बुडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.


शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रेहान शेख हा विद्यार्थी शाळेला दांडी मारून या खड्ड्याच्या परिसरात खेळत होता. त्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडलेला बॉल काढण्यासाठी रेहान गेला असता बॉल हाती लागला नाही, मात्र त्या बॉलने रेहानचा जीव घेतला.


रेहान घरातून शाळेत जाण्यासाठी निघाला मात्र तो शाळेत पोहोचलाच नाही. त्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात बुडून रेहानचा मृत्यू झाला. घटनास्थळी शाळेची बॅग आढळून आली. याच बॅगेवरून रेहानच्या नातेवाइकांनी रेहानची ओळख पटवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

वकील बनून सत्यासाठी लढणार राजसी भावे

विविध चित्रपट आणि नाटकांमधून लक्षवेधी भूमिका साकारणारी युवा अभिनेत्री राजसी भावे आता वकील बनून सत्यासाठी

माणगावात मोफत दिव्यांग शिबिराचे आयोजन

२०० दिव्यांगांना आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय मोफत. आयोजकांची माणगाव मध्ये पत्रकार परिषदेतून माहिती. माणगाव :

धर्मेंद्र यांच्या घरात खरंच पडली का फूट ? अखेर हेमा मालिनी स्पष्टच बोलल्या

Hema Malini On Dharmendra Separate Prayer Meet : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अ

साडीच्या ऑफरमुळे महिलांची चेंगराचेंगरी , ३ महिला बेशुद्ध

छत्रपती संभजीनगर : सध्या छत्रपती संभजीनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एक रीलस्टार ची रील पाहून महिलांनी

विपुल अमृतलाल शाह यांच्या ‘बियॉन्ड द केरळ स्टोरी’ची कथा आणखी गडद होणार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार प्रदर्शित

विपुल अमृतलाल शाह आणि सनशाईन पिक्चर्स लिमिटेड यांनी त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द केरळ स्टोरी 2’, ज्याचे

Ranapati Shivray Swari Agra : दिग्पाल लांजेकरांच्या चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका

सध्या सोशल मीडियावर 'रणपती शिवराय स्वारी आग्रा' या चित्रपटाची चर्चा सगळीकडे सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज