निलेश राणे यांनी वैभव नाईक यांना दिले खुले आवाहन

  400

म्हणाले तुम्ही देवावर हात ठेवा आणि...


सिंधुदुर्ग: मागील काही काळामध्ये आमदार वैभव नाईक शिंदेसोबत यायला तयार होते, मात्र त्यासाठी त्यांनी राणे जर कुडाळ - मालवण मधून निवडणूक लढणार नसतील आणि मला कुडाळ - मालवण मधून तिकीट मिळणार असेल तर मी यायला तयार आहे, अशी अट टाकल्याचा गौप्यस्फोट भाजप प्रदेश सचिव तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी केला. यावेळी त्यांनी वैभव नाईक असं बोलले की नाही? असा सवाल करत ते ज्या मंदिरात सांगतील त्या मंदिरात मी यायला तयार आहे. त्यांनी देवावर हात ठेवून सांगावं ही चर्चा झाली की नाही, असं आवाहनच दिलं.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारंवार भेटणाऱ्या वैभव नाईकचा निष्ठा या शब्दाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे निष्ठेच्या वार्ता वैभव नाईक याने करू नये. असाही जोरदार प्रहार वैभव नाईक यांच्यावर निलेश राणे यांनी केला. निलेश राणे म्हणाले, नाईक तुम्ही शिंदे साहेबांकडे किती वेळा जाऊन काय काय बोललात? किती कामे करून घेतली? कधी कुठे कुठे कसे भेटलात? हे सगळ्यांना माहित आहे त्यामुळे तुम्ही निष्ठेच्या वार्ता करु नका.


माजी खासदार निलेश राणे व वैभव नाईक यांच्यातील राजकीय वाद काही जुना नाही. मात्र वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपली कामे करून घेतली. असे असताना ते उद्धव ठाकरे यांचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याचं सांगतात. मात्र, स्वतःच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी, मी आमदार राहिलो पाहिजे या गणितामुळे त्यांना उद्धव ठाकरेंशी देणंघेणं नाही असं खळबळजनक विधान माजी खासदार निलेश राणे यांनी केलं आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण