नव वर्षाच्या स्वागतासाठी काश्मिरी मुली डोंबिवलीत दाखल

संस्कार भारतीच्या कलाकारांनी दिले रांगोळीचे प्रशिक्षण


डोंबिवली (वार्ताहर) : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. डोंबिवलीत प्रारंभ झालेल्या या स्वागत यात्रेचे यावर्षी २५ वे वर्ष असून स्वागत यात्रेत सहभागी होण्यासाठी जम्मूमधून १५ मुले दाखल झाली आहेत. मंगळवारी सकाळी डोंबिवलीतील सर्वेश सभागृहात त्यांनी संस्कार भारती रांगोळीचे प्रशिक्षण घेतले. सायंकाळी भागशाळा मैदान येथे जम्मू कश्मीर येथील हे विद्यार्थी पारंपरिक नृत्य सादर करणार आहेत.


हम या संस्थेतर्फे दोन वर्षापूर्वी काही जम्मू-काश्मिरचे विद्यार्थी स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर कोरोनामुळे या उपक्रमात खंड पडला. यावर्षी स्वागत यात्रेचे २५ वे वर्ष आहे. आपल्या संस्कृतीची आदान-प्रदान व्हावी यासाठी हा उपक्रम आम्ही दरवर्षी हाती घेतला आहे. यावर्षी संस्कार भारतीचे डोंबिवलीकर कलाकार असणारे उमेश पांचाळ यांना रांगोळी प्रशिक्षणा संदर्भात विचारले असता त्यांनी लगेच होकार दिल्याची माहिती हम संस्थेच्या नंदिनी पित्रे यांनी दिली. या मुलांमध्ये ३ मुले, तर १२ मुली काश्मीरहून आल्याचे हम संस्थेने नमूद केले. हे सर्व विद्यार्थी जम्मू येथील कीलंबी पंकजा वल्ली यांच्या आदिती प्रतिष्ठान वसतिगृहातील आहेत.

Comments
Add Comment

Thane Metro : वडाळा ते कासारवडवली प्रवास आता सुसाट! मेट्रो ४ मुळे मुंबई-ठाणे येणार अधिक जवळ, मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितला पूर्ण 'प्लॅन'

ठाणे : मुंबई आणि ठाणे या शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या मेट्रो लाईन ४

शिवसेनेच्या प्रचारात ‘नवी मुंबई, नवे सरकार’ची घोषणा

नवी मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील राजकारण चांगलेच तापले असून, मुख्यमंत्री एकनाथ

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाण्यात

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ७ जानेवारीला ठाण्यात येत आहेत.

उल्हासनगरमध्ये २० प्रभाग; ७८ जागांसाठी ४३२ उमेदवारांमध्ये सामना

पालिका निवडणुकीचा बहुरंगी महासंग्राम उल्हासनगर : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पुन्हा सुरू झाली आहे. शहरातील

अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसची युती

बहुमतासाठी अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेचा 'गेम' करण्याची रणनिती अंबरनाथ : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत

७२ तासांत बदलले तीन पक्ष; मतदार राजाही संभ्रमात!

उल्हासनगर : उल्हासनगरमधील प्रभाग क्रमांक १५ मध्ये अवघ्या ७२ तासांत घडलेल्या एका प्रकाराने महापालिका