नव वर्षाच्या स्वागतासाठी काश्मिरी मुली डोंबिवलीत दाखल

संस्कार भारतीच्या कलाकारांनी दिले रांगोळीचे प्रशिक्षण


डोंबिवली (वार्ताहर) : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. डोंबिवलीत प्रारंभ झालेल्या या स्वागत यात्रेचे यावर्षी २५ वे वर्ष असून स्वागत यात्रेत सहभागी होण्यासाठी जम्मूमधून १५ मुले दाखल झाली आहेत. मंगळवारी सकाळी डोंबिवलीतील सर्वेश सभागृहात त्यांनी संस्कार भारती रांगोळीचे प्रशिक्षण घेतले. सायंकाळी भागशाळा मैदान येथे जम्मू कश्मीर येथील हे विद्यार्थी पारंपरिक नृत्य सादर करणार आहेत.


हम या संस्थेतर्फे दोन वर्षापूर्वी काही जम्मू-काश्मिरचे विद्यार्थी स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर कोरोनामुळे या उपक्रमात खंड पडला. यावर्षी स्वागत यात्रेचे २५ वे वर्ष आहे. आपल्या संस्कृतीची आदान-प्रदान व्हावी यासाठी हा उपक्रम आम्ही दरवर्षी हाती घेतला आहे. यावर्षी संस्कार भारतीचे डोंबिवलीकर कलाकार असणारे उमेश पांचाळ यांना रांगोळी प्रशिक्षणा संदर्भात विचारले असता त्यांनी लगेच होकार दिल्याची माहिती हम संस्थेच्या नंदिनी पित्रे यांनी दिली. या मुलांमध्ये ३ मुले, तर १२ मुली काश्मीरहून आल्याचे हम संस्थेने नमूद केले. हे सर्व विद्यार्थी जम्मू येथील कीलंबी पंकजा वल्ली यांच्या आदिती प्रतिष्ठान वसतिगृहातील आहेत.

Comments
Add Comment

ठाण्यात पुलाच्या कामामुळे वाहतुकीत बदल; ३० एप्रिलपर्यंत काही मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या हे पर्यायी मार्ग

ठाणे : ठाणे शहराचा कायापालट केला जात आहे. त्यासाठी अनेक पुलांचे डागडुजीचे काम चालू आहे. त्यामुळे ठाणेकरांना

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली