नव वर्षाच्या स्वागतासाठी काश्मिरी मुली डोंबिवलीत दाखल

  162

संस्कार भारतीच्या कलाकारांनी दिले रांगोळीचे प्रशिक्षण


डोंबिवली (वार्ताहर) : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. डोंबिवलीत प्रारंभ झालेल्या या स्वागत यात्रेचे यावर्षी २५ वे वर्ष असून स्वागत यात्रेत सहभागी होण्यासाठी जम्मूमधून १५ मुले दाखल झाली आहेत. मंगळवारी सकाळी डोंबिवलीतील सर्वेश सभागृहात त्यांनी संस्कार भारती रांगोळीचे प्रशिक्षण घेतले. सायंकाळी भागशाळा मैदान येथे जम्मू कश्मीर येथील हे विद्यार्थी पारंपरिक नृत्य सादर करणार आहेत.


हम या संस्थेतर्फे दोन वर्षापूर्वी काही जम्मू-काश्मिरचे विद्यार्थी स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर कोरोनामुळे या उपक्रमात खंड पडला. यावर्षी स्वागत यात्रेचे २५ वे वर्ष आहे. आपल्या संस्कृतीची आदान-प्रदान व्हावी यासाठी हा उपक्रम आम्ही दरवर्षी हाती घेतला आहे. यावर्षी संस्कार भारतीचे डोंबिवलीकर कलाकार असणारे उमेश पांचाळ यांना रांगोळी प्रशिक्षणा संदर्भात विचारले असता त्यांनी लगेच होकार दिल्याची माहिती हम संस्थेच्या नंदिनी पित्रे यांनी दिली. या मुलांमध्ये ३ मुले, तर १२ मुली काश्मीरहून आल्याचे हम संस्थेने नमूद केले. हे सर्व विद्यार्थी जम्मू येथील कीलंबी पंकजा वल्ली यांच्या आदिती प्रतिष्ठान वसतिगृहातील आहेत.

Comments
Add Comment

मुरबाड तालुक्यातील ११ जिल्हा परिषद शाळा शिक्षकांविना

सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांचा आंदोलनाचा इशारा! मुरबाड : मुरबाड तालुक्यातील ११ जिल्हा परिषद शाळेतील

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा

१८ जागांपैकी १५ जागांवर महायुती विजयी, २ महाविकास आघाडी, तर १ अपक्ष डोंबिवली : कल्याण कृषी उत्पन्न बाजार

पर्यावरणपूरक-ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन ठाणे  : पर्यावरण पूरक व पैशाची बचत करणारा इ-ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात

सहा वर्षीय मुलीच्या चिकटलेल्या बोटांवर यशस्वी सर्जरी

ठाणे : जन्मजात हातापायाची बोटे चिकटलेली असल्यास भविष्यात त्याचा त्रास होण्याचा संभव असतो. वेळेत शस्त्रक्रिया

बदलापूरची जांभळे लंडनच्या बाजारपेठेत दाखल

बदलापूर : देशातील पहिले भौगोलिक मानांकन मिळालेली बदलापुरातील जांभळे आता देशाची सीमा ओलांडून लंडनच्या

वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या रिक्षाचालकांवर गुन्हे

डोंबिवली  : शहरातील पश्चिम रेल्वेस्थानक भागात वर्दळीच्या रस्त्यावर रिक्षा उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण