बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक

  287

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना धमकावल्या प्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. यानंतर आता अनिक्षाचे वडील कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून मुंबई सायबर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.





देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे ऑडिओ क्लिप्स आणि इतर डाटा नष्ट करण्यासाठी आरोपीने अमृता फडणवीस यांच्याकडे १ कोटींची खंडणीची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून याचप्रकरणी अनिल जयसिंघानीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.


अनिल जयसिंघानी याचे देशभरातील राजकीय नेते आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी संबंध असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. अनिल जयसिंघानीवर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि गोवा या सहा राज्यांमध्ये एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. मे २०१९ मध्ये त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. पोलीस अनिल जयसिंघानीचा शोध घेत होते. अखेर गुजरातमधून जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे.


दरम्यान, या प्रकरणाबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, आरोपींनी मुंबईच्या एका जुन्या पोलीस आयुक्तांचे नाव घेतले. अनेक मोठ्या लोकांची नावे घेतली. तो व्यक्ती सापडल्यास हा कट उघड होईल. मला वाटते की, जुन्या सरकारकडून जे प्रयत्न सुरू होते. त्यात एक नवा प्रयत्न समोर आला आहे.





याप्रकरणी मोहित कंबोज यांनी देखील एक ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरेंचा फ्रंट मॅन बुकी अनिल जयसिंघानी याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. माजी सीपी संजय पांडे आणि अजून एक माजी सीपी तुमचे दिवस आता मोजा. लवकरच सर्व गोष्टींचा खुलासा होईल!


जो लोग दूसरे के लिए गड्ढा खोद्ते है,
वह खुद एक दिन उसी गड्ढे में गिर जाते हैं


अशा शायरीच्या ओळी ट्विट करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

Comments
Add Comment

राज्य महिला आयोगाकडून रिक्त पदांवर नियुक्ती

मुंबई (प्रतिनिधी): मुळशी तालुक्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आपल्या ढिसाळ कार्यामुळे

गणपतीत तुमची कारही जाणार रेल्वे मार्गावरून

कोकण रेल्वे देणार 'रो-रो' सेवा मुंबई (प्रतिनिधी) :कोकण रेल्वे महामंडळ येत्या गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास

पंचशीलनगरला दरडीच्या तोंडी नोटीस देऊन अधिकारी निर्धास्त

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात अनेक झोपडपट्ट्या अशा आहेत, ज्या डोंगरावर किंवा डोंगर उतारावर वसल्या आहेत. त्यापैकीच

पहिल्या यादीत ६ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांचा अकरावीत प्रवेश

मुंबई : दहावीचा निकाल जाहीर होऊन दीड महिना उलटला तरीही राज्यातील विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळाला नव्हता.

'समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे, परंतु हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत'

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सरकारला इशारा मुंबई : राज्य सरकारने त्रिभाषा संदर्भातील दोन जीआर रद्द केले आहेत.

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास, विद्यार्थी हितासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती - मुख्यमंत्री

पावसाळी अधिवेशनात १२ विधेयके लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ३६०० कोटी मंजूर मुंबई : राज्यात सर्व