बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना धमकावल्या प्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. यानंतर आता अनिक्षाचे वडील कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून मुंबई सायबर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.





देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे ऑडिओ क्लिप्स आणि इतर डाटा नष्ट करण्यासाठी आरोपीने अमृता फडणवीस यांच्याकडे १ कोटींची खंडणीची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून याचप्रकरणी अनिल जयसिंघानीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.


अनिल जयसिंघानी याचे देशभरातील राजकीय नेते आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी संबंध असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. अनिल जयसिंघानीवर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि गोवा या सहा राज्यांमध्ये एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. मे २०१९ मध्ये त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. पोलीस अनिल जयसिंघानीचा शोध घेत होते. अखेर गुजरातमधून जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे.


दरम्यान, या प्रकरणाबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, आरोपींनी मुंबईच्या एका जुन्या पोलीस आयुक्तांचे नाव घेतले. अनेक मोठ्या लोकांची नावे घेतली. तो व्यक्ती सापडल्यास हा कट उघड होईल. मला वाटते की, जुन्या सरकारकडून जे प्रयत्न सुरू होते. त्यात एक नवा प्रयत्न समोर आला आहे.





याप्रकरणी मोहित कंबोज यांनी देखील एक ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरेंचा फ्रंट मॅन बुकी अनिल जयसिंघानी याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. माजी सीपी संजय पांडे आणि अजून एक माजी सीपी तुमचे दिवस आता मोजा. लवकरच सर्व गोष्टींचा खुलासा होईल!


जो लोग दूसरे के लिए गड्ढा खोद्ते है,
वह खुद एक दिन उसी गड्ढे में गिर जाते हैं


अशा शायरीच्या ओळी ट्विट करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात