ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

कोल्हापूर : ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी आज वयाच्या ८८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरमधील कळंबा शिवप्रभू नगर येथील निवासस्थानी त्यांची सकाळी सहा वाजता निधन झाले.


भालचंद्र यांनी असला नवरा नको गं बाई, पिंजरा, मुंबईचा जावई, सोंगाड्या, थरथराट, खतरनाक अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी वेगवेगळ्या भूमिका देखील साकारल्या. त्यांना आतापर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.


भालचंद्र यांनी आजवर ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रापासून लांब होते. याकाळात भालचंद्र हे कोल्हापूरमधील कळंबा शिवप्रभू नगर येथील एका प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून काम करत होते.


‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या १९८४ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे गाणे खूप लोकप्रिय आहे. आजही नवरात्रीत हे गाणे नक्कीच ऐकायला मिळते.


भालचंद्र यांनी फक्त मराठी नाही तर कोल्हापुरात प्रदर्शित झालेल्या काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. भालचंद्र यांची खूप साधी राहणी होती. भालचंद्र यांनी सगळ्या चित्रपटांमध्ये प्रत्येक भूमिका ही परफेक्ट असली पाहिजे यासाठी ते प्रयत्न करायचे. ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे काही वर्षे सचिव तर अनेक वर्षे संचालक होते. त्यांना महामंडळाच्या वतीने नुकताच चित्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता.


भालचंद्र यांनी मर्दानी (१९८३), मासूम (१९९६), झुंज तुझी माझी (१९९२), हळद रुसली कुंकू हसलं (१९९१), माहेरची साडी (१९९१) या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. चित्रपट महामंडळाच्या सांस्कृतिक, चित्रपट विषयक तसेच आंदोलनात्मक कामातही ते सक्रिय होते. शालिनी, जयप्रभा स्टुडिओचे जतन व्हावे, या लढ्यात ते अग्रभागी होते. त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून ही काम केले होते.


Comments
Add Comment

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

Defamation on social media :सोशल मीडियावर बदनामी करणे महागात पडणार, कायद्यात बदल करण्यासाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा (Social media platforms) वापर करून पुराव्यांविना केली जाणारी बदनामी (Defamation) आणि त्यातून

Nashik TCS Case : “धर्मांतरासाठी दबाव, बुरखा-नमाजचे प्रशिक्षण”, सरकारी वकिलांनी केले अनेक धक्कादायक दावे

- निदा खानला ११ मेपर्यंत पोलिस कोठडी नाशिक : नाशिकमधील TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात

Nashik TCS Case : निदा खानच्या आजच्या पहिल्या सुनावणीत न्यायालयात घडलं ?

Nashik TCS Case : टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला अखेर छत्रपती संभाजी नगरमधून अटक करण्यात आली. गेले 25 दिवस निदा खान

Bengaluru-Nagpur Flight : नागपुरातील मुसळधार पावसाचा विमानसेवेवर परिणाम; इंडिगोचे बेंगळुरू-नागपूर विमान रायपूरला वळवले

नागपूर : नागपूर शहरात गुरुवारी (७ मे) दुपारनंतर अचानक झालेल्या मुसळधार पावसाने आणि वेगवान वादळी वाऱ्यांनी जनजीवन

Sanjay Shirsat Criticized Imtiaz Jaleel : “निदा खानला इम्तियाज जलील यांचा आश्रय”; मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर हल्लाबोल

मुंबई : नाशिकमधील टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणातील