मालवण दांडी किनारी २७ ते ३० एप्रिलला ‘गाबीत महोत्सव’

Share

मालवण ( प्रतिनिधी ) : अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ व गाबीत समाज महाराष्ट्र आणि गाबीत समाज सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत ४ दिवस “गाबीत महोत्सव”आयोजन मालवण दांडी किनारी करण्यात आले आहे.

याबाबत पूर्व नियोजनासाठी गाबीत समाजाची बैठक नुकतीच मालवण येथे पार पडली. यावेळी अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर, गाबीत समाज महाराष्ट्र अध्यक्ष सुजय धुरत, गाबीत समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, ऍड. काशिनाथ तारी, नारायण आडकर, कार्याध्यक्ष बाबा मोंडकर, राजन गिरप, मेघनाथ धुरी, दिपक तारी, सौ. स्नेहा केरकर, रविकिरण तोरसकर, महेंद्र पराडकर, संजय पराडकर, लक्ष्मण तारी, किरण कुबल, यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महोत्सवासाठी सर्वाना सहभागी करून घेण्यासाठी ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता वेंगुर्ला तालुका बैठक हुले यांचे होमस्टे मांडवी येथे आयोजित केली आहे. १२ मार्च रोजी देवगड शिक्षक भवन येथे सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली आहे. तसेच १३ मार्च रोजी मालवण येथील दांडेश्वर मंदिर येथे सकाळी ११ वाजता मालवण तालुका गाबीत समाज बैठक आयोजित केली आहे.
आणि १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मालवण येथील दांडेश्र्वर मंदिर दांडी येथे सर्व जिल्हा व तालुका गाबीत बांधवांची बैठक होणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

5 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

6 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

7 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

7 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

8 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

8 hours ago