मालवण दांडी किनारी २७ ते ३० एप्रिलला 'गाबीत महोत्सव'

मालवण ( प्रतिनिधी ) : अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ व गाबीत समाज महाराष्ट्र आणि गाबीत समाज सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत ४ दिवस "गाबीत महोत्सव"आयोजन मालवण दांडी किनारी करण्यात आले आहे.


याबाबत पूर्व नियोजनासाठी गाबीत समाजाची बैठक नुकतीच मालवण येथे पार पडली. यावेळी अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर, गाबीत समाज महाराष्ट्र अध्यक्ष सुजय धुरत, गाबीत समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, ऍड. काशिनाथ तारी, नारायण आडकर, कार्याध्यक्ष बाबा मोंडकर, राजन गिरप, मेघनाथ धुरी, दिपक तारी, सौ. स्नेहा केरकर, रविकिरण तोरसकर, महेंद्र पराडकर, संजय पराडकर, लक्ष्मण तारी, किरण कुबल, यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महोत्सवासाठी सर्वाना सहभागी करून घेण्यासाठी ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता वेंगुर्ला तालुका बैठक हुले यांचे होमस्टे मांडवी येथे आयोजित केली आहे. १२ मार्च रोजी देवगड शिक्षक भवन येथे सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली आहे. तसेच १३ मार्च रोजी मालवण येथील दांडेश्वर मंदिर येथे सकाळी ११ वाजता मालवण तालुका गाबीत समाज बैठक आयोजित केली आहे.
आणि १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मालवण येथील दांडेश्र्वर मंदिर दांडी येथे सर्व जिल्हा व तालुका गाबीत बांधवांची बैठक होणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण